Ahmednagar News :- अहमदनगर येथील उच्चदाब विद्युत वाहिन्यामध्ये वीज पुरवठा चालू असताना उड्डाणपुलाचे काम सुरू असताना कामगारांनी जेसीबीच्या सहाय्याने वाहिनीचे केबल तोडले असल्याची घटना घडली.
यामुळे महावितरणचे 65 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी महावितरणे कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून उड्डाणपुलाच्या बांधकामाचा ठेका घेतलेल्या एम. एस. दिनेशचंद्र आर. आग्रवाल इंन्फ्राकॉन प्रा. लि. या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. शेळके व त्यांचे कंपनीचे इतर कामगारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात कोठला स्टॅन्ड ते सक्कर चौक दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाचे काम करणार्या कामगारांनी जेसीबीच्या सहाय्याने बांधकाम कार्यालयाजवळ महावितरण कंपनीच्या भूमीगत उच्चदाब वाहिनीची केबल कामात हलगर्जीपणा करून तोडून नुकसान केले.
सदर उड्डाणपुल बांधकाम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 17 तास वीज पुरवठा खंडीत राहित्यामुळे महावितरण कंपनीच्या महसूलात तुट झाली आहे.
सदर परिसरात तुटलेल्या उच्चदाब विद्युत वाहिन्यामध्ये वीज पुरवठा चालू असताना उड्डाणपुलाचे बांधकाम करणार्या कंपनीने हलगर्जीपणाचे वर्तन करून
दोन भूमीगत विद्युत वीज वाहिण्या तोडून तेथून जाणार्या-येणार्या व तेथे काम करणार्या लोकांच्या जिवीतास धोका निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.