राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत मोठा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती.
आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात घोषणा केली असून राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मंगळवारी यासंदर्भात सविस्त बैठक झाल्यानंतर आज उदय सामंत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे.
सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी करोनाबाधित असतील तर त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये. याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे. खासगी विद्यापीठांनी देखील याच निर्णयाचं पालन करायला हवं”, असं ते म्हणाले आहेत.
Trending
- Electricity bill waived या सर्व नागरिकांचे वीज बिल माफ, वीज बिल माफ यादीत तुमचे नाव तपासा
- Gramsevak Bharti 10 हजार पदांसाठी नवीन ग्रामसेवक भरतीचा सरकारचा मोठा निर्णय
- online land record :आता तुमच्या घरच्या आरामात तुमच्या शेत जमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा ऑनलाइन पहा
- अहमदनगर जिल्हात काही ठिकाणी पावसाची रिम झिम
- Aadhaar Card : आता आधार क्रमांकावरूनच पैसे मिळणार, ट्रान्सफर, ओटीपी किंवा पिनची गरज नाही, कसे ते जाणून घ्या
- ‘वेड’ चित्रपट कसा आहे?
- What are the best restaurants to try when visiting Ahmednagar, Maharashtra, India?
- What are the best Internet service providers in Ahmednagar?