बॉलीवूड हा वर्षभरात हजाराहून अधिक सिनेमे बनवणारा उद्योग आहे. ह्यातील काही चित्रपट हिट होतात तर काही फ्लॉप. असे ही काही चित्रपट असतात जे ह्या ना त्या कारणाने बंद पडतात आणि बरेच चित्रपट असे ही असतात जे पूर्ण होतात पण वादग्रस्त असल्याने चित्रपटगृहापर्यंत पोचू शकत नाहीत.
काही चित्रपटांवर सेन्सॉर बोर्डाद्वारे प्रतिबंध लावला जातो. अश्लील भाषा किंवा दृश्य, धार्मिक भावना दुखावणे, लिंग भेदभाव अश्या बऱ्याच कारणांमुळे चित्रपटांवर प्रतिबंध लावला जातो. खाली दिलेल्या काही चित्रपटांवर अजून ही प्रतिबंध आहे तर काही चित्रपट अथक प्रयत्नांनी रिलिज झाले आहेत.
बैंडेट क्वीन : डाकू फुलन देवीवर आधारित ह्या चित्रपटावर सुरवातीला बरीच वर्षे बंदी होता. हिंसात्मक आणि अश्लील भाषेमुळे ह्या चित्रपटावर प्रतिबंध लावण्यात आला होता. मात्र काही कालावधीने यावरील बंधने उठवण्यात आली आणि हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज झाल्यावर प्रेक्षक आणि समीक्षक या सर्वांच्या पसंतीस उतरला होता.
फायर : 1996 मध्ये चित्रीकरण झालेला हा चित्रपट दीपा महेता ह्यांनी दिग्दर्शित केला आहे. एका हिंदू परिवारातील दोन स्त्रीया लेस्बियन दाखवल्या गेल्यामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला होता.
कामसूत्रा–ए टेल ऑफ लव : 1996 मध्ये मीरा नायर ह्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला. अश्लील संवाद आणि अश्लील दृश्य ह्या कारणांनी चित्रपट बॅन झाला. मात्र त्यावेळी या चित्रपटाचे समर्थ आणि विरोध ह्या दोन्ही बाजूनी चित्रपटाविषयी प्रतिकेय दिल्या गेल्या.
पांच :1997 मध्ये पुण्यात झालेल्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर आधारित हा सिनेमा हिंसक दृश्य, अश्लिल भाषा आणि ड्रग्स मुळे बॅन झाला. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर तसेच इतरही अनेक मातब्बर कलाकार होते. एका भयंकर अशा हत्याकांडाच्या मालिकांवर हा चित्रपट आधारित असल्याने या चित्रपटाविषयी अनेकांना कुतूहल होते.
परजानिया : गुजरात दंग्यावर आधारित ह्या चित्रपटाने समीक्षकांची प्रशंसा तर मिळवली तरीही गुजरातमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. गुजरात दंगल झाली तेव्हा वास्तवामध्ये अनेक दूरगामी परिणाम विविध घटकांवर झाले होते. त्यामुळे गुजरातमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
वॉटर : विधवा महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा दीपा मेहेतांचा हा चित्रपट. हा सिनेमा 2007 च्या अकादमी अवॉर्डससाठी नॉमिनेट झाला होता, पण वादग्रस्त असल्याने बॅन झाला.
हे होते बॉलीवूड चे काही वादग्रस्त सिनेमे. ह्यातील बऱ्याच चित्रपटांना भारताबाहेर खूप चांगला प्रतिसाद मिळाला पण काही कारणामुळे भारतात प्रसिद्ध होऊ शकले नाहीत.