देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप आटोक्यात येत असताना दिसत आहे. त्यामुळे आता काही राज्यांनी अनलॉकच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित केले.
नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
जगभरात गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठी महामारी
जगातील सर्व देशांप्रमाणे भारत देश देखील दु:खातून जात आहे. आपल्यातील अनेक जणांनी आप्तस्वकीयांना गमावलं. त्या सर्व कुटुंबाप्रती माझी संवेदना. गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठी महामारीचं संकट, यापूर्वी अशी महामारी कोणी पाहिली, ना पाहतील, असं मोदी म्हणाले.
लसीकरणाचं कव्हरेज वाढवलं
2014 मध्ये भारतात लसीकरण कव्हरेज 60 टक्क्यांच्या आसपास होतं. ही भारतासाठी चिंताजनक बाब होती. अशावेळी भारताला 100 टक्के लसीकरणाचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 40 वर्षे लागली असती. त्या पार्श्वभूमीवर आपण मिशन इंद्रधनुष योजना आणली. मिशन मोडवर काम करुन आपण केवळ 4-5 वर्षात लसीकरण कव्हरेज आपण 60 टक्क्यांवर 90 टक्क्यांवर आणलं.
भारतीय बनावटीच्या दोन लसींची निर्मिती
जगाला चिंता होती की भारत कोरोनाचा सामना कसा करेल? पण नियत साफ आणि मेहनत असेल तर सगळं होतं. भारताने 1 वर्षात एक नाही तर दोन भारतीय बनावटीच्या लसींची निर्मिती केली. आपण दाखवून दिलं की भारत अनेक मोठ्या देशांपेक्षा मागे नाही. आणखी तीन कोरोना लसींची चाचणी सुरु आहे. देशात 7 कंपन्यां लस उत्पादन करत आहेत.
21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देणार
आता जी जबाबदारी राज्यांना दिली होती, ती 25 टक्के जबाबादारी केंद्र स्वीकारेल, येत्या दोन आठवड्यात ते लागू केलं जाईल. त्याबाबत नवी नियमावली तयार केली जाईल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देणार.
लसनिर्मिती कंनप्यांकडून एकूण उत्पन्नाच्या 75 टक्के लसी भारत सरकार खरेदी करुन, राज्य सरकारांना मोफत देणार. आतापर्यंत देशातील अनेक नागरिकांना मोफत लस मिळाली आहे. आता १८ वर्षावरील लोकांनाही मोफत लस मिळेल.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा कालावधी वाढवला
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअतंर्गत गरिबांना धान्याचं वाटप दिवाळीपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेनुसार 80 कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत राशन पुरवणार असल्यांच मोदींनी नमूद केलं.