कोरोना महामारीमुळे स्थगित झालेल्या आयपीएलचे उरलेले सामने यंदा देखील युएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे 29 सामन्यांनंतर 2021 चा आयपीएल हंगाम स्थगित करण्यात आली. यानंतर आता उरलेले 31 सामने युएई (UAE) मध्ये खेळवण्याचा मोठा निर्णय BCCI ने घेतला. एवढेच काय तर आता IPL च्या अंतिम सामान्यचे देखील तारीख ठरली असल्याचे सांगतले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे उरलेले सामने सुरू होणार असून यंदा IPL चा अंतिम सामना (Final) दसऱ्याच्या मुहुर्तावर 15 ऑक्टोबर रोजी खेळवली जाईल. कोरोना महामारीमुळे मागील वर्षातील आयपीएलचे सर्व 60 सामने युएईमध्ये खेळवले गेले होते.
यंदाच्या उर्वरित मोसमाविषयी बीसीसीआय आणि अमिराती क्रिकेट बोर्ड यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे. तर बीसीसीआयकडून दुबई, शारजा आणि अबुधाबीमध्ये आयपीएलचे यशस्वी आयोजन करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तर आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंच्या सहभागाबाबत साशंकता आहे, पण आम्ही त्यांच्या बोर्डाशी बोलत आहोत. त्यांच्याकडूनही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे आता जवळपास सर्व परदेशी खेळाडू पुन्हा उपलब्ध असतील असे दिसत आहे.
यंदाचा हंगामात पॉईंट्स टेबलमध्ये सध्या 12 गुणांसोबत दिल्लीची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने 8 पैकी 6 सामनात आपला विजय मिळवला आहे. तर आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं नाही, तर बोर्डाला 2500 रुपयांचं मोठे नुकसान होईल, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने यांनी याआधीच सांगितलं होतं.
दरम्यान, यानिर्णय नंतर आता क्रिकेट चाहत्यांना लवकरच उर्वरित आयपीएल सामने पाहण्याचा आनंद घेता येणार हे नक्कीच…