संपूर्ण जगात पुन्हा हाहाकार माजवणाऱ्या कोरोना महामारीच्या विषाणूने मागील काही दिवसं पासून क्रिकेट खेळाडूंच्या घरी एन्ट्री केली आहे. मागील आठवड्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आता सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या आई वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. ती बातमी ताजी असतानाच त्यानंतर आता अश्विनच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे माहिती मिळाली आहे. त्याने ही माहिती ट्विट करत दिली आहे.
काय म्हटले आहे अश्विनने ट्विटमध्ये?
”मी मंगळवारपासून चालू आयपीएल स्पर्धेतून ब्रेक घेत आहे. माझं कुटुंब सध्या कोव्हिड 19 विषाणूशी सामना करत आहे. त्यामुळे या कठीण काळात मला कुटुंबियांसोबत राहणं खूप आवश्यक आहे. जर गोष्टी पहिल्यासारख्या झाल्या तर मी पुन्हा आयपीएल खेळण्याची आशा आहे.” अशा आशयाचे ट्विट अश्विनने केले आहे. रात्री उशिरा 1 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास अश्विननं ट्विट करत आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
I would be taking a break from this years IPL from tomorrow. My family and extended family are putting up a fight against #COVID19 and I want to support them during these tough times. I expect to return to play if things go in the right direction. Thank you @DelhiCapitals 🙏🙏
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) April 25, 2021
तर आर.अश्विनच्या ट्विटला रिप्लाय देत दिल्ली कॅपिटल्स संघानंही अश्विनला पूर्णपणे पाठिंबा दिला असल्याचे चित्र दिसत आहे. “अश्विन, कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगी संपूर्ण संघ तुझ्या आणि तुझ्या कुटुंबियांच्या सोबत आहे. तुला आणि तुझ्या सर्व कुटुंबियांना कठीण प्रसंगाला तोंड देण्याची ताकत मिळो अशी दिल्ली कॅपिटल्समधील प्रत्येक खेळाडूकडून प्रार्थना केली आहे”, असं ट्विट दिल्ली कॅपिटल्स संघाकडून करण्यात आलं आहे.
Extending our full support to you in these difficult times, @ashwinravi99 🤝🏽
Sending you and your family all the strength and prayers from all of us at Delhi Capitals 💙 https://t.co/JoqzDGFVdB
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 25, 2021
काल झालेल्या अटीतटीच्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट्सच्या बदल्यात 159 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादलाही 20 ओव्हरमध्ये 159 धावा करता आल्या. त्यामुळे सामना अधिक रंजक बनला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटलने हैदराबादला धोबीपछाड करत विजय मिळवला आहे. पण कालच्या सामन्यात अश्विनला फारशी चांगली कामगिरी करता आली नसुन, त्याने 4 ओव्हरमध्ये 27 धावा दिल्या आहेत.