आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आयुष्य जगत असताना अनेक प्रसंगांना, अनुभवांना सामोरे जावे लागते. यातून काही सुखद असतात तर काही दुःखद. मात्र या सर्वावर मात करून पुढे कसे जात येईल याविषयी तुकाराम महाराज एका अभंगातून सांगतात.
न लगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥१॥
अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ध्रु.॥
सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हुन ॥२॥
तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥३॥
अभंगाचा मतितार्थ :
जंगलात असलेल्या सुगंधी चंदन वृक्षाला आपण सुगंधी आहोत हे इतरांना सांगण्याची गरज नसते. त्याच्या सुगंधी गुणातून तो दरवळून आपोआप इतरांना माहिती होतो.
मनातील अथवा अंतःकरणातील सत्यता हि आपसूकच बाहेर पडते हा स्वभाव गुणधर्म आहे. त्याला मनात दाबून किंवा झाकून ठेवता येऊ शकत नाही.
सूर्याचा किंवा किरणांचा उगवणे हा स्वभावधर्म आहे. ते जगाला ‘जागा हो’ असे सांगत बसत नाहीत. ते त्यांच्या स्वभावधर्माप्रमाणे कार्य करत राहतात.
अगदी याचप्रमाणे, आकाशात मेघ दाटून आले कि मोर त्याचा आनंद लपवून ठेऊ शकत नाही, आणि तो नाचू लागतो. अगदी त्याचप्रमाणे सत्यदेखील लपवता येत नाही.
हा सुंदर विचार नक्की शेअर करा..!