राज्यातील अनलॉकबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केलेली घोषणा आता खरी ठरली आहे. राज्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे आता येत्या 7 जूनपासून पाच टप्प्यात अनलॉक करण्यात निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काल 4 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास याबाबतचा महत्वपूर्ण आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून आता 5 स्तर निश्चित करण्यात आले असून, टप्प्याटप्याने आता लवकरच राज्य संपूर्ण अनलॉक होणार असल्याचे नियमावलीमध्ये सांगतले आहे.
जाणून घ्या कोणता जिल्हा कधी होणार अनलॉक?
पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे : औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे , वर्धा, वाशिम, यवतमाळ
दुसर्या टप्प्यात 5 जिल्हे : अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार
तिसरा टप्प्यात 10 जिल्हे : अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर
चौथ्या टप्प्यात 2 जिल्हे : पुणे आणि रायगड
पहा अनलॉक करण्यासाठी कसे असणार निष्कर्ष :
पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर
पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील