एका छोट्याशा खोलीत राहणारे सुंदर पिचाई कसे पोहोचले गुगलच्या सीईओ पदापर्यंत? जाणून घ्या त्यांचा रंजक आणि प्रेरणादायी प्रवास!
गुगल हे आपल्यासाठी एक ज्ञान भांडार झाले आहे. प्रत्येक जण कोणतीही गोष्ट शोधायचे असेल किंवा जाणून घ्यायचे असेल तर, गुगलचा आधार घेतो. याच गुगल चे सीईओ भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे आहेत. ही भारतासाठी मानाची आणि गौरवास्पद गोष्ट आहे.
कोणताही व्यक्ती एखाद्या मोठ्या पदावर जाऊन पोहोचतो तेव्हा, त्यामागे त्याचे भरपूर कष्ट आणि सातत्य असते हे प्रत्येकाने स्वीकारायलाच हवे. आज आपण सुंदर पिचाई यांचा गरिबीतून आजच्या दिवसापर्यंत पोहोचण्याचा प्रवास जाणून घेणार आहोत.
10 जून 1972 रोजी जन्म झालेले सुंदर पिचाई हे तमिळनाडूतील मदुराई या छोट्या गावचे! सुंदर पिचाई यांनी आयआयटी खरगपूर येथेून मेटलर्जिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर ते अमेरिकेत गेले. देशातील लाखो तरुणांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी असलेल्या सुंदर पिचाई यांचा हा अद्भूत जीवनपट पाहूया.
अमेरिकेतील जीवनप्रवास
तिथे त्यांनी जगविख्यात स्टॅनफर्ड विद्यापीठातून मटेरियल्स सायन्स आणि इंजिनियरिंगमधून एमएस केले. स्टॅनफर्ड विद्यापीठाने त्यांना सिबेल स्कॉलने नामांकित केले.
त्यानंतर पेनसिल्व्हॅनिया विद्यापीठातील व्हार्टन स्कूलमधून एमबीएदेखील केले. तिथे सुंदर पिचाई यांना पाल्मर स्कॉलरसाठी नामांकित करण्यात आले.
एका कंपनीत कामाला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी गुगल साठी काम करायला सुरुवात केली. गुगल क्रोम, गुगल मॅप, जीमेल यासारख्या विविध सेवांमध्ये सुंदर पिचाई यांनी आपली वेगळी कामगिरी करून दाखवली.
2004 मध्ये त्यांनी गुगल जॉईन केले होते त्यानंतर 2015 मध्ये त्यांच्यावर अल्फाबेट च्या सीईओ पदासाठी देखील जबाबदारी देण्यात आली. अल्फाबेट ही गुगलची पॅरेण्ट कंपनी आहे.
गुगल मधील त्यांचा प्रवास अविरत सुरूच राहिला 2017 मध्ये आयआयटी खरगपुर मध्ये त्यांनी भेट दिली आणि स्वतःच्या होस्टेलला जाऊन आपण राहत असलेल्या रूममध्ये देखील थोडा वेळ घालवला.
लहानपणी त्यांना क्रिकेटची आवड होती. त्यांना आपणही क्रिकेटर व्हावे असे लहानपणी वाटायचे. सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर प्रमाणे आपल्याला खेळता यावे असे आपले स्वप्न होते, असेही त्यांनी सांगितले.
एका छोट्याशा रूम मध्ये राहून ज्या व्यक्तीने आयआयटी कॉलेज जॉईन केल्यानंतर पहिल्यांदा कॉम्प्युटर पाहिला. तो गुगल सारख्या मोठ्या कंपनीत सीईओ पदावर आहे, ही गोष्ट खरच अभिमानास्पद आहे. यातून, अनेकांना परिस्थितीच्या बाहेर जाऊनही माणूस आपली स्वप्ने साकारू शकतो, याचे बळ नक्कीच मिळेल.