🚀 भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम हे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यासाठी ओळखले जातात. कलाम यांनी असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर एक साधा पेपर विकणारा मुलगा ते भारताचा राष्ट्रपती असा प्रवास केला.
[sc name=”adg”]
🇮🇳 त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. कलाम हे सर्वोच्च पदावर पोचल्यावरही त्यांनी आपला साधेपणा, प्रामाणिकपणा सोडला नाही. त्यांच्या आयुष्यातील खाली दिलेल्या काही निवडक प्रसंगावरून हेच दिसून येते.
👉 एकदा डॉ. कलाम राष्ट्रपती असताना ते एकदा केरळमधील त्रिवेंद्रमच्या राजभवनाला एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांच्यासोबत आणखी 2 व्यक्ती आणण्याची अनुमती देण्यात अली होती. मात्र कलाम यांनी कोणत्याही सेलिब्रेटींना सोबत न नेता त्या कार्यक्रमासाठी एक मोची आणि एका हॉटेलमालकाला सोबत नेले होते. राष्ट्रपती बनण्यापूर्वी अब्दुल कलाम त्रिवेंद्रममध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना या दोन लोकांना ओळखत होते.
[sc name=”adg”]
👉 दुसरा प्रसंगदेखील त्यांच्या हळव्या मनाचा प्रत्यय देणारा आहे. डॉ. कलाम DRDO मध्ये काम करत असताना तिथे एका संरक्षक भिंतीचे काम चालू होते. या भिंतीच्या वरच्या पृष्ठभागावरून कुणी आत येऊ नये म्हणून त्या भागांवर काचा लावण्याचे काम चालू असताना कलाम यांनी त्याला विरोध केला. यामुळे पक्षी भिंतीवर बसल्यास पक्षांच्या पायाला इजा होईल हा कलाम यांचा उदात्त विचार त्यामागे होता.
[sc name=”adg”]
🤝 म्हणूनच आयुष्यात मोठा व्यक्ती बनायचे असल्यास सचोटी, प्रामाणिकपणा, आदर करणे, नम्र असणे या गोष्टी आवश्यक असतात.
🎯 हि माहिती नक्की शेअर करा..!
[sc name=”adg”]