भारतातील कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा अतिशय कोलमडून गेली आहे. ऑक्सिजन अभावी देशात अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडे जगभरातून मोठ्या प्रमाणात मदतीचा हात पुढं येत आहे.
त्यातच भारतामध्ये आयपीएल खेळण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातून खेळणारा पॅट कमिन्सनं ( Pat Cummins) भारतातील कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लाख मोलाची मदत करताना दिसत आहे.
पॅट कमिन्सने सर्वांन आधी एक पाऊल पुढे येत भारतातील रुग्णालयात ऑक्सिजनची पूर्तता व्हावी यासाठी पीएमकेअर फंडात 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलरची मदत केली आहे म्हणजे अर्थात भारतीय रुपयांमध्ये 37 लाखांची मदत कमिन्सने केली आहे. एवढेच नाही तर त्याने आपल्या अन्य सहकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन देखील सर्वाना केले आहे.
देशातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना कठिण परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार आणि प्रशासनाची कसरत अगदी जोमाने सुरु आहे. या कोरोना महामारीच्या संकटजन्य परिस्थितीत अनेकजण आवश्यक वस्तूंची कमतरता भरुन काढण्यासाठी पुढे येताना दिसत आहे. यापूर्वी देखील कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात असणारा आणि भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजनने पुण्यातील लोकांसाठी मोबाईल व्हॅन दिल्याचे पाहायला मिळाले होते. कोरोना संकटात मदतीचा हातभार लावणारा पॅट कमिन्स कोलकातासंघाकडून ट्विटच्या माध्यमातून पॅट कमिन्सने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
काय म्हणाला पॅट कमिन्स?
पॅट कमिन्स म्हणाला एक खेळाडू म्हणून माझीही काही जबाबदारी आहे. ज्यामुळे मी भारतीय पीएम केअर फंडला निधी देण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, भारतातील रुग्णालयात ऑक्सिजनच्या खरेदीसाठी हा निधी असणार असून माझ्या बरोबर माझे आयपीएलमधील इतर सहकाऱ्यांनाही मदत करण्याचे आवाहन करतो, असे पॅट कमिन्स इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये लिहले आहे.
— Pat Cummins (@patcummins30) April 26, 2021
दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाताकडून जबरदस्त कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या नाईट राईडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंसने मैदानाबाहेर देखील मोठी कामगिरी करताना दिसत आहे. कमिंसने कोरोनाविरुद्ध लढ्यात भारतासाठी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे सर्वांनी कौतूक केले आहे. पॅट कमिंसच्या या निर्णयामुळे भारताला कोरोनाविरुद्धच्या लढाईत अधिक बळ मिळेल, असे बोलणे व्यर्थ ठरणार नाही.