महाराष्ट्रात पुन्हा एकदा वेगाने कोरोना संसर्ग पसरू लागल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच महाराष्ट्राच्या चिंतेत गुरुवारी मोठी भर पडली. कोरोना संकट गडद झाल्याची जाणीव काल सायंकाळी आलेल्या आकडेवारीने सरकारला आणि जनतेला करून दिली.
राज्य शासनाने कोविडचा वाढत प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत काही आदेश निर्गमित केले आहेत.
काय आहेत नवीन नियमावली?
राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थितीची परवानगी.
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे.
नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती 50 टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, राजकीय मेळावे यासाठी करता येणार नाही.
तर प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तापमान तपासण्यात येईल, तर मास्क असल्याशिवाय प्रवेश नाही. त्याचबरोबर सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे.
शासनाने काढलेला हा आदेश 31 मार्च पर्यंत अंमलात येणार असून त्यानंतर पुढील आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.
दरम्यान, कोविडचा वाढत प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यात नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. तर नव्या आदेशाचं पालन न केल्याचं कडक कारवाई केली जाईल, असा इशारा शासनाकडून देण्यात आला आहे.