ब्रेकिंग..!!! राज्यातील हॉटेल्सबाबत राज्यसरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रात मिशन बिगेन अगेन अंतर्गत कोरोना निर्बंधात शिथिलता देण्यात आली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र आता अनेक जिल्ह्यांत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्यामुळे पुन्हा निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र यावेळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे.
दरम्यान, असे असून देखील राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेल सध्या 4 वाजेपर्यंत सुरु होतं मात्र आता 15ऑगस्टपासून संपूर्ण राज्यातील हॉटेल्स10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला आहे. तसेच मॉल्स सुरु करण्यात आले असून केवळ दोन लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना याठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे.
राज्यात 15 ऑगस्टपासून काय सुरु, काय राहणार बंद?
हॉटेल्स, रेस्टॉरंट, जिम, मॉल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार
सदर आस्थापना 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाहसोहळ्यांसाठी 200 जणांना परवानगी
बंदिस्त सभागृहात होणाऱ्या विवाहसोहळा समारंबांसाठी सभागृहाच्या 50 टक्के उपस्थितांची संख्या
सभागृहातील विवाहसोहळ्यांसाठी 100 हून अधिक पाहुण्यांची उपस्थिती नकोच
खासगी कार्यालयांमध्ये शिफ्ट ड्युटीमध्ये काम करत कार्यालयं 24 तास सुरु ठेवता येतील
तसेच कार्यालयात 25 टक्के क्षमतेनं शिफ्ट्स मध्ये काम कामाच्या सूचना
नाट्यगृह, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, धार्मिक स्थळं बंद
इनडोअर गेम्ससाठी लसीचे दोन डोस झालेल्यांनाच मान्यता
हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आलेल्यांना वेटींग कालावधीत मास्क घालणं बंधनकारक, तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतलेले असणं आवश्यक.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कोरोनाची तिसरी लाटयेण्याची भीती व्यक्त केली जात आहे, जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाईल, त्या दिवशी लॉकडाऊन पुन्हा लागेल, असा कडक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.