स्वस्त धान्य मिळण्यात अडचण येत आहे? या नंबरवर करा तक्रार!
सरकार गरीबांना स्वस्त धान्य उपलब्ध करुन देते. रेशन कार्डद्वारे स्वस्त धान्य दिलं जातं. या कार्डमुळे कोरोनाकाळात अनेकांना याचा फायदा झाला आहे. दिवाळीपर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत देशभरात फ्री धान्य दिलं जात आहे.
परंतु याचदरम्यान अनेक लोकांना कमी धान्य मिळत असून रेशन कार्ड डीलर ते धान्य प्रायव्हेट लोकांना विकत असल्याची माहिती समोर आली आहे.
असं काही तुमच्यासोबतही झालं असल्यास किंवा यासंबंधी कोणतीही तक्रार असल्यास तुम्ही टोल फ्री नंबरवर तक्रार करू शकता. सरकारने राज्यांच्या हिशेबाने टोल फ्री नंबर जारी केले आहेत.
📞दिल्ली – 1800-110-841
📞महाराष्ट्र – 1800-22-4950
📞गुजरात – 1800-233-5500
📞गोवा – 1800-233-0022
📞केरळ – 1800-425-1550
📞कर्नाटक – 1800-425-9339
त्याशिवाय तुम्हाला एनएफएसएच्या (NFSA) वेबसाईट https://nfsa.gov.in वरुनही नंबर घेता येईल.