आयसीएमआरचा नवा निष्कर्ष; लसीचे ‘इतके डोस’ घेऊन होणार कोरोनापासून संरक्षण!
कोरोना लसीकरण 30 कोटीच्या आसपास देशात झाले आहे. कोरोनाग्रस्त दुसऱ्या लाटेनंतर कमी असले तरी अजूनही संसर्ग कमी नाही. आयसीएमआर नॉर्थ ईस्ट आणि आसाम मेडिकल कॉलेजने एक नवा निष्कर्ष प्रयोगाअंती मांडला आहे.
आता कोरोना होऊन गेलेल्या लोकांना 1 डोस लस पुरेशी प्रतिकारशक्ती देऊ शकते हे आपण ऐकले होते. मात्र, आता कोरोना होऊन गेलेले आणि न झालेले दोन्ही नागरिक एका डोस मध्ये योग्य प्रतिकारशक्ती मिळवू शकतात. कसे जाणून घ्या:
18 ते 75 वयोगटातील 121 नागरिकांच्या अँटिबॉडिज टेस्टचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला. कोरोना झालेले आणि न झालेले असे दोन्ही प्रकारचे नागरिक यात होते. लस घेण्यापूर्वी, पहिला डोस घेतल्यानंतर 25 ते 35 दिवसांनी आणि मग दुसऱ्या डोसनंतर 25 ते 35 दिवसांनी त्यांची अँटिबॉडी टेस्ट करण्यात आली.
ज्यांना पहिला डोस घेण्याअगोदर कोरोनाची लागण होऊन गेली होती, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता पहिल्या डोसनंतरच वाढत असल्याचं लक्षात आलं. शिवाय, कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींमधील अँटिबॉडिजच्या संख्येत दुसऱ्या डोसनंतर विशेष फरक पडत नसल्याचंही दिसून आलं.
याचा उपयोग भारतासारख्या देशात होऊ शकतो. लसींच्या कमतरतेमुळे लसीकरण थांबण्याची वेळ सुद्धा याने येणार नाही. प्रत्येकाचे लसीकरण वेळेत पूर्ण होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एक मोठा फरक याने दिसून येईल.