राज्यात कोरोना महामारीने पुन्हा एकदा आपले डोकं वर काढलं असून कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत चालेल आहे हे दिसून आले आहे. कोरोनाचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला असून शिक्षणाना देखील चांगलाच त्रास झाला आहे.
मात्र, आता दुसरीकडे विद्यार्थी आणि पालकांना परीक्षांची चिंता सतावू लागली आहे. कारण नियमित कॉलेज नाही तर काही प्रमाणात लेक्चर ऑनलाईन होऊ शकले, पण आता परीक्षा ऑनलाईन होतील का? झाल्या तर कशा होणार? आणि ऑनलाईन नाही तर ऑफलाईन तरी कशी घेतली जाणार? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडले आहेत.
दरम्यान, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हा ऐन परीक्षांचाच हंगाम असल्यामुळे आता शिक्षण विभागाला देखील कोरोना महामारीच्या बदलत्या परिस्थितीमध्ये परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण पावलं उचलणं आवश्यक होऊन बसलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे.
मंत्री उदय सामंत म्हणाले..:
राज्यात यंदाचा वर्षी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन पद्धतींनी घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, यासंदर्भात संबंधित विद्यापीठांनी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठाकडून हे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत असे सांगतले आहे.
या दोन्ही पर्याय ऐच्छिक असल्यामुळे परीक्षा ऑनलाईन द्यायची की ऑफलाईन, याचा निर्णय आता स्वतः विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे”, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
शालेय परीक्षांचा निर्णय अजूनही प्रलंबित..:
काही परीक्षांबाबत निर्णय झाला असला, तरी अद्याप शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेतल्या जाणार? याविषयी अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. तर शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात देखील राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या यासंदर्भातल्या निर्णयाची प्रतीक्षा आता विद्यार्थी आणि पालकांना लागली आहे असे दिसून आले आहे.
दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरू केली गेली आहेत. 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू झाली आहेत. उदय सामंत यांनी 1 फेब्रुवारी रोजी सर्व कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर ही विद्यालये सुरू करण्यात आली आहेत.
हि माहिती नक्की शेअर करा..!