मागील अनेक दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनातील मोठा प्रश्न म्हणजे 1 जूनपासून लॉकडाऊन हटविण्यात येणार का? असा अनेक सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान याचा प्राश्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी हा उद्या संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला आव्हान केले आहे. तर एवढेच नाही तर मागील दीड वर्षांपासून लोकांनी स्वतःवर जो संयम ठेवला आहे त्याचं देखील कौतुक केलं. तर दुसरीकडे राज्यच्या शहरी भागापेक्षा गावाकडे जास्त रूग्ण वाढत असल्याची खंत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
⚫ कोरोना महामारीची दुसरी लाट अपेक्षेपेक्षा खूप मोठी होती. दरम्यान राज्यातील रुग्णसंख्ये अद्यापही पहिल्या लाटेच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
⚫ तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहे तर ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी तेथे नियम शिथिल करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे अत्यावश्यक सेवेतील दुकानं आता सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहणार आहेत. दुसरीकडे राज्यातील जिल्हाबंदीदेखील कायम ठेवण्यात आली आहे.
⚫ राज्यातील काही भागांत कोरोनाबाधितांची संख्या घटत असून ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात आज कोरोनाची रुग्णसंख्या 18 हजारांवर आली आहे. मात्र, पहिल्या लाटेतील ही संख्या सर्वोच्च होती.
⚫ दुसर्या लाटेतला विषाणू झपाट्याने पसरतो आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन नाही परंतु निर्बंध कायम राहणार आहेत. राज्यात म्युकरमायकोसीसचा धोका वाढतोय. बुरशीच्या नव्या आजारावर टास्कफोर्स काम करत आहे. कोरोनाचे नवे स्ट्रेन अधिक घातक आहे, खबरदारी घेतली नाही तर तिसरी लाट येऊ शकते.
⚫ तर, जून महिन्यापासून लसीचा पुरवठा सुरळीत होईल व लवकरच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
⚫ दरम्यान, राज्यासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे यावेळी रूग्ण बरे होण्याचं प्रमाण 92 टक्क्यांवर आहे. त्यामुळे राज्यसाठी आपण कडक निर्बंध लावत आहोत, पण कडक लॉकडाउन केलेला नाही. तर कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक त्यामुळे स्वतः बरोबर आपला लहान मुलांची काळजी घ्या असे आवाहन देखील मुख्यमंत्रीनी जनतेला केला आहे.