केरळमध्ये मान्सून कधी दाखल होणार हे हवामान विभाग कसे ठरवते? वाचा!
मे महिन्याच्या अखेरीस भारतीय हवामान विभाग केरळमध्ये मान्सून कधी दाखल होणार याबाबत शक्यता वर्तवत असते. मात्र ही शक्यता वर्तवण्यासाठी भारतीय हवामान विभाग कसे ठरवते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्यासाठी भारतीय हवामान विभागाने काही निकष निश्चित केले आहेत. त्याविषयी हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या ट्विटरवरुन माहिती दिली आहे. ती पाहुयात..
केरळमध्ये मान्सून दाखल झाला हे कसं ठरतं? : केरळमध्ये मान्सून पोहोचला की नाही हे सांगण्यासाठी भारतीय हवामान विभाग केरळातील 14 ठिकाणांवरील पावसाचे प्रमाण, वाऱ्यांचा वेग आणि ऑऊटगोईंक लाँगव्हेव रेडिएशन याबाबत माहिती करून घेते.
खालीलप्रमाणे निकष आहेत :
– पाऊस :14 स्टेशन्सपैकी, 60% स्टेशन्सने 2 दिवस 2.5 mm किंवा जास्त पावसांची नोंद करणे (10मे नंतर ), तर दुसऱ्या दिवशी
– वारे फील्ड: वेस्टरलीज़ची उंची (Westerly winds) 600 hpa पर्यंत असणे, गती 15-20kts
– आऊटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन < 200wm-2
देशभरात या ठिकाणी आहे हवामान केंद्र : हवामान विभागानं निश्चित केलेल्या 14 केंद्रांमध्ये मिनीकॉय, अमिनी, थिरुअनंतरपुरम, पुनालूर, कोल्लम, अल्लापुझा, कोट्टायम, कोची, थ्रिसुर, कोझिकोडे, थलासरी, कन्नूर, कुडूलू आणि मंगलोर केंद्राचा समावेश आहे.
यापैकी 60 टक्के म्हणजेच जवळपास 9 ठिकाणी दोन दिवसांमध्ये 2.5 mm पावसाची नोंद होणे आवश्यक आहे. वारे फील्ड या निकषामध्ये वेस्टरलीजची उंची (Westerly winds) 600 hpa पर्यंत असणे आवश्यक असून त्याची गती 15-20kts असली पाहिजे. तर, आऊटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन < 200wm-2 इतकं आहे.
असे असेल यंदाचे पर्जन्यमान! : स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम.6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते.