आयपीएलचा नवा नियम अन् सर्व संघाची पंचाईत!
[sc name=”adg”]
अवघ्या काही दिवसानंतर आयपीएलच्या 14 व्या मौसमाला सुरुवात होईल. मात्र यंदाचे सिझन सर्व संघांसाठी थोडे कठीणच जाणार आहे. कारण बीसीसीआयने वेळेच्या बाबतीत एक कठोर निर्णय घेतला आहे
दरम्यान नव्या नियमानुसार आयपीएलमधील प्रत्येक संघाला आपला डाव 90 मिनिटांच्या आत संपवावा लागणार आहे. दुसरीकडे या निर्णयामुळे चौथ्या पंचाची ताकद वाढणार आहे.
वेळेचा नवा नियम काय आहे? : अगोदर प्रत्येक डावाचे 20 वे षटक 90 व्या मिनिटाला सुरु व्हायला हवे, असा नियम होता. पण आता नियमात बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार सामन्याचे 20 वे षटक 90 व्या मिनिटाला संपायला हवे.
[sc name=”adg”]
बीसीसीआयने म्हटले आहे कि, आयपीएलमध्ये प्रत्येक संघाला एका तासात सरासरी 14.11 षटकं टाकणे बंधनकारक असणार आहे. कोणत्याही व्यत्ययाशिवाय होणारा सामन्याचा एक डाव 90 मिनिटांच्या आत संपायला हवा. म्हणजेच खेळासाठी 85 मिनिटं आणि 5 मिनिटं टाइमआऊटसाठी असतील. व्यत्यय येणाऱ्या सामन्यासाठी 20 षटकांचा खेळ निर्धारित वेळेत न संपल्यास प्रत्येक षटकासाठी 4 मिनिटं 15 सेकंदाचा अतिरिक्त वेळ देण्यात येऊ शकतो.
दरम्यान आता सामन्यात कोणताही संघ जर वेळ वाया घालवत असेल तर चौथ्या पंचाची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे. वेळ वाया घालविणाऱ्या फलंदाजांना सूचना किंवा इशारा देण्याचा अधिकार चौथ्या पंचांना असणार आहे. या निर्णयामुळे सामना वेळेत संपेल मात्र संघासाठी हा निर्णय डोकेदुखी ठरू शकतो, एवढं नक्की!
[sc name=”adg”]
https://myletstalks.in/breaking-the-situation-in-maharashtra-is-dire-state-government-announces-new-regulations/