मुंबईसह राज्यभरात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले :
लॉकडाऊन हे मुख्यमंत्री, मला आणि कुणालाही मान्य नाही. सध्या 85 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. उरलेले 15 टक्के रुग्णांपैकी काही रुग्ण आयसीयू आणि ऑक्सिजन बेडवर जाण्याचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे भविष्यात बेड कमी पडू नये याचा अभ्यास करावा लागतो आणि निर्णय घ्यावा लागतो असे ते म्हणाले.
[sc name=”adg”]
तहान लागल्यावर विहिरी खोदायची नसते. आपल्याला तयारी करून ठेवावी लागते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत सूचना केल्या असे टोपे म्हणाले. साधारणतः 10 ते 20 टक्के बेड शिल्लक असतील आणि जास्त रुग्ण वाढण्याची देखील शक्यता असेल.
लॉकडाऊनच्या निर्णयावरुन महाविकासआघाडी सरकारमधील पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. लॉकडाऊन हा कोणालाही प्रिय नसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही तशी इच्छा नाही. महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला पुन्हा लॉकडाऊन लागावा, असे वाटत नाही.
[sc name=”adg”]
पण आपल्याकडे ‘तहान लागल्यावर विहीर खोदायची’, अशी एक म्हण आहे. तशी परिस्थिती ओढावू नये म्हणून आपण तयारी करत आहोत. राज्यात दररोज 35 ते 40 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊनसारखा पर्याय वापरावा लागेल.
[sc name=”adg”]
तर लसीकरणाचे काही नियम पाळावेच लागतात. 2 ते 8 डिग्रीच्या तापमानात लस ठेवावी लागते.त्यापेक्षा जास्त तापमानात लस ठेवली तर परिणामकारकता कमी होते. त्यामुळे जिथे कोल्ड स्टोरेज चैन आहे त्याची खात्री करूनच सेंटरला परवानगी दिली जाते.
दरम्यान, लॉकडाऊनपेक्षा काही कठोर असे निर्बंध वाढवले जाण्याची शक्यता जास्त आहे. उपलब्ध बेडची संख्या आणि वाढणार्या रुग्णांची संख्या यात खूप तफावत असेल तर मात्र आम्हाला लॉकडाऊनचे पाऊल उचलावे लागेल असे मंत्री टोपे म्हणाले
https://myletstalks.in/status-critical-cm/