चिंतेत भर.! राज्यात पुन्हा कडक लॉकडाउन होण्याची शक्यता
गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने जगभरात थैमान घातलं आहे. तर भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. आताकुठे ही लाट आटोक्यात आली होती. सर्व पूर्वीसारखं सुरळीत होत होतं. एवढ्यात देशासमोर आणखीन दोन मोठे संकट उभे राहिले. देशात मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले असून हे संकट कमी होत नाही तो पर्यंत राज्यात डेल्टा प्लस विषाणूचा (delta plus variant) धोका वाढल्याचे समोर आले आहे.
आतापर्यंत या व्हेरिएंटचे भारतात एकूण 40 रूग्ण सापडले आहेत. यातील सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्र राज्यात आढळून आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध पुन्हा कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवार 23 जून रोजी राज्यमंडळाची बैठक घेण्यात आली होती.
राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात यासंदर्भात बुधवारी चर्चा झाली असून निर्बंध वाढवायचे की नाही यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्यातली रूग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी केली असे हि ते म्हणाले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी 09 हजारांच्या खाली गेलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी अचानक काही प्रमाणात वाढ झाली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दिवसभरात 10000 हुन अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 163 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला. असायचे सामोरे आहे आहे.
राज्यातील आकडा असचं राहिल्यास राज्यात पुन्हा निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच दुकानांच्या वेळा पुन्हा एकदा कमी करण्यात येतील, असा इशाराही सरकारकडून देण्यात आला आहे. तसेच राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचा इशारा केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी करणं हे आरोग्य प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे. कारण महाराष्ट्रात येत्या तीन- चार आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.