पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाने त्यानुसार नव्याने अध्यादेश लागू केला आहे. या अध्यादेशानुसार एक मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते अकरा च्या दरम्यान सुरू राहतील. इतर वेळेस सर्व दुकाने, कार्यालय, भाजीपाला बाजार बंद राहतील.
▪️ हॉटेल, रेस्टॉरंटस, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलेवरी चालू राहील
▪️ धार्मिक स्थळे पुर्णतः बंद राहतील
▪️ आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील
▪️ भाजीपाला / फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील.
▪️ दारु दुकाने पूर्णतः बंद राहतील
▪️ टैक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू राहतील. चार चाकी खाजगी वाहने फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू राहतील.
▪️ दोन चाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
▪️ सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील
▪️ कटींग सलून, स्पा, ब्यूटीपार्लर पुर्णतः बंद राहतील
▪️ शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील
▪️ स्टेडिअम, मैदाने पूर्णतः बंद राहतील
▪️ विवाह समारंभास बंदी राहील.
▪️ चहाची टपरी /दुकाने पूर्णतः बंद राहतील
▪️ अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहतील
▪️ सिनेमा हॉल, नाटयगृह, सभागृह, संग्रहालय पूर्णतः बंद राहतील सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक,धार्मिक व क्रिडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील
▪️ सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील
▪️ सेतू ई-सेवा केंद्रे, आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील
▪️ व्यायाम शाळा, स्विमींग पुल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग इव्हीनिंग वॉक पुर्णतः बंद राहील. बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील
या सेवांना वेळेची मर्यादा :
प्रशासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते अकरा वाजेच्या दरम्यान सुरू राहतील.
▪️ किराणा दुकाने
▪️ दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री
▪️ भाजीपाला विक्री फळे विक्री
▪️ अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्री
▪️ कृषी संबंधीत सर्व सेवा/दुकाने
▪️ पशुखादय विक्री
▪️ पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरीता पेट्रोल डिझेल/सीएनजी/एलपीजी गॅस विक्री
▪️ पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा/मालवाहतूक याकरीता डिझेल विक्री
दरम्यान, या आवाहनाला जनता कसा प्रतिसाद देते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे, तर या काळात काेणत्या सेवा सुरू राहणार याबाबत प्रशासनाकडून काेणत्याही सूचना आलेल्या नाहीत.