ठाकरे सरकारकडून कोरोना निर्बंधांबाबत नवी नियमावली जाहीर
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चिन्ह दिसत आहे. यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याबाबतच्या मागणींनी जोर धरला होता. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नुकतीच अनलॉकबाबतची नवी नियमावली जाहीर केली असून जवळपास 25 जिल्ह्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. या नव्या नियमावलीनुसार, राज्यात सोमवार ते शनिवारपर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्या भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्या ठिकाणी कोरोनाचे निर्बंध कायम असणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही, त्यामुळे लोकलचा निर्णय एवढ्यात घेता येणार नाही. तर ज्या ठिकाणी कोरोना कमी झाला, तिथे दुकानं रात्री 8 पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या नियमावलीनुसार वेळेत वाढ करुन दिली आहे. यानुसार आता सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं सुरु ठेवता येणार आहेत. आम्हाला व्यावसायासाठी वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती. ही मागणी आता मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात आनंदाचं वातावरण आहे.
राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये अधिक रुग्ण
महाराष्ट्रातील 11 जिल्हे असे आहेत या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. संक्रमणाचा दर जास्त आणि कोरोना रुग्ण अधिक आढळत असल्यानं, सक्रीय कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
कारणे
या अकरा जिल्ह्यामध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण अधिक आहेत. कोरोना संक्रमणाचा दर अधिक आहे. सिंधुदुर्ग, सातारा आणि अहमदनगरमध्ये नव्या केसेस मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे या अकरा जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध लावण्याचा निर्णय झाला आहे.
त्या अकरा जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्ण किती?
पुणे (15680), सातारा (8153), सांगली, (7546) कोल्हापूर (5970), अहमदनगर (6610), सोलापूर (4936), रायगड (2830), रत्नागिरी (2249), सिंधुदुर्ग(1986), बीड (1831), पालघर (1115) सक्रिय रुग्ण आहेत.
नियमावली :
1) सर्व आवश्यक आणि अनावश्यक दुकाने (शॉपिंग मॉलसह) आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री 8 पर्यंत आणि शनिवारी दुपारी 3 पर्यंत खुली राहतील. अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने आणि मॉल्स रविवारी बंद राहतील.
2) व्यायाम, चालणे, जॉगिंग आणि सायकलिंग या हेतूने सर्व सार्वजनिक उद्याने आणि क्रीडांगणे खुली ठेवली जाऊ शकतात.
3) सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यरत असू शकतात. प्रवास करताना गर्दी टाळण्यासाठी कामाच्या तासांची योग्य नियम करावे लागणार आहे.
4) जी कार्यालये वर्क फ्रॉम होम करू शकतात त्यांनी असे करणे सुरू ठेवले पाहिजे.
5) सर्व कृषी कामे, नागरी कामे, औद्योगिक कामे, मालाची वाहतूक पूर्ण क्षमतेने कार्यरत राहू शकते.
6) व्यायामशाळा, योग केंद्रे, हेअर कटिंग सलून, ब्यूटी पार्लर, स्पा हे एअर कंडिशनर (AC)चा वापर न करता आणि 50% क्षमतेसह आठवड्याच्या पाच दिवस रात्री 8 पर्यंत आणि शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत खुले राहू शकतात. या सेवा रविवारी बंद राहतील.
7) सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स (स्वतंत्र आणि मॉलच्या आत) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
8) राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
9) राज्य शिक्षण विभाग आणि उच्च व तांत्रिक विभागाचे आदेश, शाळा आणि महाविद्यालयांसाठी लागू होईल.
10) सर्व रेस्टॉरंट्स 50% आसन क्षमतेसह आठवड्याच्या दिवशी सायंकाळी 4 पर्यंत खुल्या राहतील, सर्व कोविड 19 प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या अधीन. पार्सल आणि टेक अ वेला सध्या परवानगी आहे.
11 रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत हालचालींवर निर्बंध लागू होतील.
12) गर्दी टाळण्यासाठी, वाढदिवस साजरा करण्यावर निर्बंध, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, निवडणूक प्रचार, रॅली, निषेध मोर्चे चालू ठेवणे.
13) सर्व कोविड 19 प्रोटोकॉलमध्ये मास्कचा वापर, सामाजिक अंतर इत्यादी सर्व नागरिकांनी राज्यभर काटेकोरपणे पाळावेत. याचे कठोर पालन करण्यात अयशस्वी झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, महामारी कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 1860 च्या संबंधित कलमांखाली दोषींवर कारवाई होईल.
या आदेशात विशेषतः नमूद नसलेले इतर सर्व मुद्दे पूर्वीच्या आदेशानुसार लागू होतील.