महाराष्ट्रात कोरोनाच्या महामारीने डोकं वर काढले आहे तर दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. त्यामुळे या प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर जास्तीत जास्त भर देण्याची सुचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी केली.
तर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना देखील पत्र पाठवून पत्राद्वारे काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
केंद्रीय पथकानं राज्याला दिलेल्या पत्रामध्ये म्हटले :
▪️ कोरोना व्हायरसचा संसर्ग आणि संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्याचे कलेक्टर आणि महापालिका आयुक्त यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा कार्यपथकांची स्थापना करण्यात यावी. या पथकाच्या कामावर देखील लक्ष ठेवण्यात यावं.
▪️ कंटेनमेन्ट भागांमध्ये घरोघर जाऊन रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात यावा.
▪️ पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान 20 ते 30 व्यक्तींचा शोध घेण्यात यावा. यामध्ये कुटुंब, परिसरातील लोक, कामाची जागा आणि इतर कारणांनी संपर्कात येणाऱ्यांचा समावेश असावा.
▪️ कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात येण्याची गरज आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचं प्रमाण एकूण चाचण्यांच्या 5 टक्क्यांपेक्षा कमी यायला हवं असे सांगतले आहे.
▪️ रुग्णाला घरी आयसोलेट करताना त्याच्यासोबत घरी क्वारंटाईन होणाऱ्या कुटुंबियांत कोणी हाय-रिस्क गटातलं आहे का, हे तपासण्यात यावं.
▪️ कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेतल्या पायाभूत सुविधा आता पुरेशा असल्या, तरी परिस्थिती चिघळल्यास काय गरज लागेल, याचा विचार करून तयारी करावी.
▪️ कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्ससोबत उपचारांसाठीच्या प्रोटोकॉल्सची उजळणी करण्यात यावी. तर डेथ ऑडिट पुन्हा सुरू करण्यात यावं
▪️ फ्रंटलाईन वर्कर्स लस घेण्यास उत्सुक नाहीत. याबद्दल पावलं उचलण्यात यावीत. कारण रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर त्यांची गरज भासेल.
▪️ कोव्हिड 19 होऊ नये म्हणून वावरताना काय खबरदारी घ्यायची यासाठी मोठी जनजागृती मोहीम राबवण्यात यावी.
▪️ नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन यासारख्या उपायांचा संसर्ग रोखण्यासाठी वा नियंत्रित करण्यासाठी फारसा परिणाम होत नाही.
दरम्यान, या सर्व बाबी केंद्रीय आरोग्य पथकाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे सरकारने भविष्यासाठी गतीने सज्ज व्हावे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी केंद्राच्या सुचनांप्रमाणे करावी, असे या पत्रात म्हटले आहे.