नियोजित वेळेत परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन; वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वपूर्ण माहिती
राज्यात वेगाने वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने एका महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे 10 व 12 चे जे विद्यार्थी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना आणखी एक संधी दिली आहे.
ही सूट जे विद्यार्थी कोरोनाबाधित, विद्यार्थ्याच्या घरात किंवा परिसरात कोरोना रुग्ण असतील, तसेच तो राहत असलेला विभाग सील केला असेल, अशा विद्यार्थ्यांना आता परीक्षा देता येणार नाही.
दहावी-बारावीची परीक्षा देता आली नाही तर काय?
▪️ कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा देता आली नाही, तर जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार
▪️ विद्यार्थ्याला किंवा त्याच्या घरातील सदस्याला कोरोना झाला, परिसरात कोरोनाबाधित अनेक असतील, इमारत/परिसर सील केला असेल, तर विद्यार्थ्याने परीक्षा देऊ नये.
▪️ विद्यार्थी परीक्षेला येऊ शकला नाही तर, शाळा/महाविद्यालयाने विद्यार्थ्याची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे.
▪️ अशा विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार आहे.
दरम्यान, बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर परिक्षेबाबत काही महत्वाचे निर्णय बोर्डाने आधीच घेतले आहेत.