मागच्या वर्षी यूएई मध्ये आयपीएलचे सामने रंगले होते. या वर्षीचा हंगाम हा भारतामध्ये सुरू झाला आणि क्रिकेटप्रेमींना अक्षरशः वेड लागले. आयपीएलचे स्वतःचे वेगळे चाहते आहेत. त्यामुळे, भारतातील काय पूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमी आयपीएलची वाट बघत असतात.
गेल्या वर्षभरापासून आयपीएलची उत्सुकता भारतीयांना लागली होती. मात्र मधल्या काळामध्ये कोरोना महामारी ने देशातील आरोग्य व्यवस्था आणि परिस्थिती दोन्ही बिघडून गेले. कोरोना ची दुसरी लाट आल्यानंतर 4 मे रोजी आयपीएल मधूनच स्थगित करावा लागला.
उर्वरित 31 सामने आता कुठे खेळले जाणार? या विषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. भारतामध्ये परिस्थिती अभूतपूर्व असल्याकारणाने, भारतात आयपीएल खेळवणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक होऊन बसले.
त्यानंतर आयपीएल कुठे खेळवला जाणार हा प्रश्न कायम होता. मात्र, आता बीसीसीआयने याविषयी मोठा निर्णय जाहीर केला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने यूएई इथेच होणार असून, मागच्या वर्षीप्रमाणे उर्वरित सामन्यांसाठी हाच देश बीसीसीआयला सुरक्षित वाटला. भारतामध्ये अर्धा आयपीएलचा हंगाम झाल्यानंतर आता उर्वरित हंगाम युएई मध्ये खेळवला जाणार आहे.
IPL has been moved to UAE for this season: Vice-President BCCI Rajeev Shukla to ANI pic.twitter.com/wqEukw6KGP
— ANI (@ANI) May 29, 2021
सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यांमध्ये उर्वरित सामने खेळवले जाणार असून, भारतात थंडीची लाट आणि पावसाचे सरते वातावरण असल्याने, त्या काळात भारतात सामने घेणे योग्य होणार नाही, असे कारण बीसीसीआयच्या कार्यकारी मंडळाने दिले आहे.
आयपीएलचा हंगाम भारतात सुरू असताना कोरोनाचा उद्रेक झाला होता. याचा फटका आयपीएलमधील खेळाडूंना देखील बसला. खेळाडू स्वतः जरी बायबलमध्ये असले तरी देखील विविध देशातून आलेले खेळाडू यामुळे घाबरून गेले होते. अनेकांनी आयपीएलमधून माघार घेतली. परिस्थिती बिघडली आणि याच कारणामुळे, आयपीएलचा हंगाम स्थगित करण्यात आला होता.
यंदाचा टी-20 विश्वचषक भारतात आयोजित करण्याचं नियोजन आहे. मात्र भारतात वाढत्या कोरोना संकटामुळे विश्वचषक भारतात घेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान याबाबतचा निर्णय करण्यासाठी 1 जून रोजी बैठक होणार असून त्या बैठकीतच विश्वचषकाबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.