मोदी सरकारने नोटाबंदी केल्यानंतर उद्भवलेली समस्या आपण अनेक जणांनी अनुभवली आहे. एटीएम च्या बाहेर लागलेल्या रांगा, वस्तू खरेदी करण्यासाठी खिशात पैसे असून त्याचा उपयोग न होणे, यासारख्या अनेक समस्या आपण अनुभवले आणि त्या अजुनही आठवणी आपल्या मनामध्ये जाग्या आहेत.
असे असतानाच, आता पुन्हा एकदा नोटा बदलणार आहेत. मात्र पूर्ण नोटा नाहीतर शंभराच्या नोटा बाबत मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
केंद्र सरकारने आरबीआयला एक अब्ज शंभराच्या नवीन नोटा बनवण्याची परवानगी दिली आहे यामध्ये नेमका मोठा बदल काय आहे? नोटाबंदीचे वेळी आपण नोटांचा कलर बदललेला पाहिला होता.
त्याचबरोबर 2 हजाराची नोट नवीन आलेली 500-1000च्या नोटा बंद झाल्या, आणि 500 ची देखील नोट नवीन आपल्या खिशात आली. यावेळी, मात्र जांभळ्या रंगात राहणार असून, महात्मा गांधी सिरीज मधूनच ही नोट येणार आहे.
मग तुम्हाला प्रश्न पडेल की, शंभराची नोट बदलायची वेळ का आली? तर प्रायोगिक तत्त्वावर शंभराच्या नोटेला वॉर्निश लावून बाजारात आणले जाणार आहे. यामुळे तिचा टिकण्याचा कालावधी जो तीन वर्ष पर्यंत असतो, तो साडेसात वर्षांवर जाणार आहे.
या नोटांचे वैशिष्ट्य असे की, त्या पावसात भिजणारी नाहीत तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्या फाटणार नाहीत. त्यामुळे सहसा पाण्यात भिजल्याने किंवा नोट फाटल्याने होणारे नुकसान कमी होणार आहे, आणि त्याचा टिकण्याचा कालावधी देखील वाढणार आहे.
केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर एक अब्ज नोटा छापण्याची परवानगी आरबीआयला दिली आहे. या नोटा किती टिकतात आणि चलनामध्ये कशाप्रकारे चालतात, याचा अभ्यास करून पुढील निर्णय केंद्र सरकार घेईल. त्यामुळे, इथून पुढे येणाऱ्या नोटा ह्या टिकाऊ असतील आणि त्यांचे वेगळे रूप आपल्याला पाहायला मिळेल एवढे निश्चित!