कोरोना महामारीच्या काळात एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे पेट्रोल, डिझेलसह खाद्य तेलाचे दरही गगनाला भिडले आहेत. या कोरोना महामारीच्या संकटकाळात खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकार शेतकऱ्यांना तेलबिया बियाणे मोफत देण्याची मोठी घोषणा केली आहे. जेणेकरून लोकांना स्वस्तात खाद्यतेल मिळू शकेल. असे झाल्यास प्रामुख्यने या तेलबियांचे देशांतर्गत उत्पादन वाढेल आणि अतिरिक्त आयातीवरील अवलंबन देखील कमी होईल. तर जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या खरीप पिकांसाठी उच्च प्रतीची हजारो तेलबिया बियाणे पाकिट हे शेतकऱ्यांना मोफत दिले जाईल. असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगतले आहे.
मनी कंट्रोलच्या माहितीनुसार..: तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी मोदी सरकार शेतकऱ्यांना सुमारे 800,000 सोयाबीन बियाण्यांचे आणि 74,000 शेंगदाण्याचे मिनीकिट्स देणार आहे.
तर याशिवाय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार… मागील एका वर्षात खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये साधारणता: 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता एक लिटर मोहरी तेलाची सरासरी किंमत हि 170 रुपयांवर असून, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 120 रुपये इतकी होती.
मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयांचा कोण-कोणत्या राज्यांना होणार फायदा :
या निर्णयाचा फायदा हा मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील 41 जिल्हाच्याआंतरपिकासाठी 76.03 कोटी रुपये खर्च करून सोयाबीनचे बियाणेचे वाटप होणार आहे. यामुळे नक्कीच 1.47 लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची पेरणी होईल. व याव्यतिरिक्त, 104 कोटी रुपये किंमतीचे सोयाबीन बियाणे आठ राज्यात वितरित केले जाईल, ज्यात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात या 73 जिल्ह्यांचा समावेश आहे.