महाराष्ट्र लॉकडाउनच्या उंबरठ्यावर! एका दिवसांत सापडले तब्बल ‘इतके’ रुग्ण
[sc name=”adg”]
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे खाटा व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या असून स्थिती अशीच राहिली तर मृत्यू संख्याही वाढण्याचा धोका आहे.
राज्यात दिवसागणिक अधिकाधिक नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान होत असून कालचा आकडा धडकी भरवणारा आला आहे.
नेमके काय :
गेल्या 24 तासांत राज्यात 40 हजार 414 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. परवा ही संख्या 35, हजार 726 इतकी होती. परवाच्या तुलनेत ही वाढ 4 हजार 611 ने अधिक होती.
राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. कोरोनाचा संसर्ग आता हाताबाहेर जातांना दिसत आहे. लोकांकडून नियमांचं पालन होत नाहीये. वारंवार आवाहन करुन इशारा देऊनही लोकांमध्ये कुठलही गांभीर्य आलेलं दिसत नाहीये.
तर पुण्यातिल परिस्थिती देखील गंभीर आहे. पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच एका दिवसात दोन हजारांचा टप्पा ओलांडला. काल 2275 रुग्णांची नोंद.
कोरोनाचे तब्बल 40 हजार 414 हा आकडा हा गेल्या काही महिन्यातील नवीन कोरोना बाधितांचा उच्चांक मानला जातो. तर काही प्रमाणात दिलासादायक म्हणजे 17 हजार 874 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.
[sc name=”adg”]
तर कालच्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय
मर्यादित काळासाठी टाळेबंदी लावावी
मदत व पुनर्वसन सचिवांनी टाळेबंदीची कार्यपद्धती ठरवावी
मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश बंदी
ऑक्सिजन पुरवठा, ई आयसीयू, व्हेंटिलेटर्सची उपलब्धता
मनुष्यबळ वाढवण्यासाठी खासगी डॉक्टर्सची मदत
दरम्यान, राज्यात काल वाढलेला आकडा हा फक्त प्रशासनासाठीच नाही तर राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी धोक्याची घंटा म्हणून मानले जाते. [sc name=”adg”]
https://myletstalks.in/great-opportunity-for-graduates-recruitment-for-150-posts-under-bank-of-maharashtra/