महाराष्ट्राची चिंता वाढली! या नवीन आजाराचे राज्यात 2000 हुन अधिक रुग्ण; कोणाला होतो हा आजार? वाचा
आधीच कोरोना महामारीनं (coronavirus) मागली एक दिड वर्षपासून देशभरात हाहा:कार माजवला आहे. देशभरात सर्वात जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. राज्यात दररोज 40 हजारांहुन अधिक कोरोना रुग्ण सध्या आढळत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्हात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु आता महाराष्ट्रची चिंता वाढवणारी बातमी कोरोनाचा उद्रेक सुरुच असताना आता राज्यात आणखी एक मोठा संकट आलं आहे.
आधीच कोरोना महामारीने हैराण झालेल्या नागरिकांमध्ये आता म्युकॉरमायकोसिस (Mucormycosis) या बुरशीजन्य संसर्गाने भीती वाढवली आहे. राज्यात म्युकॉरमायकोसिस चे रुग्ण दिवासागणिक वाढत चालले असून, सध्याच्या घडीला राज्यात 2000 हुनअधिक रुग्ण बाधित आहे. म्युकॉरमायकोसिस या आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. म्युकॉरमायकोसिस रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलली आहे. असे टोपे म्हणाले…
हा आजार म्हणजे नेमका काय आहे? व तो कसा होतो? यावर उपचार काय? जाणून घ्या सविस्तर :
म्युकरमायकोसिस म्हणजे नेमके काय?
म्युकरमायकोसिस हा प्रामुख्याने बुरशीमुळे होणारा गंभीर आजार आहे. मनुष्यच्या नाकाच्या आजुबाजूला असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसध्ये म्युकरमायकोसिस रोगांच्या बुरशीची वाढ होते. तर माणसांची प्रतिकारशक्ती कमी असल्यास ती शरीरात वेगाने वाढते. पुढे ती बुरशी रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करण्याचे काम करते. हे इन्फेक्शन अनेकदा जबडा, दात, डोळे आणि कधी माणसांच्या मेंदूपर्यंत देखील पसरते.
हा आजार कोणाला होऊ शकतो?
म्युकरमायकोसिस आजार हे एक फंगल इन्फेक्शन आहे. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती खूपच कमी आहे, किंवा मधुमेह, किडनीचे आजार आहेत, ज्यांचे ऑर्गन ट्रान्सप्लांट झाले आहे त्यांना हा आजार होण्याची भीती असते. वास्तविक आजवर या आजाराचे रुग्ण हे क्वचित आढळायचे. मात्र, आता कोरोनानंतर या आजचे रुग्ण्याची मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
या आजाराची प्रमुख कारणे काय?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर या आजाराचे रुग्ण कमालीचे वाढले आहेत. दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण जास्त असून, तेथे कोरोनासाठी देण्यात येणारी औषधे, किंवा मधुमेह व कोरोनामुळे कमी झालेली प्रतिकारशक्ती, ही त्याची प्रमुख कारणे असू शकतात.
म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात डोळ्यांशी संबंधित जास्त लक्षणे दिसत असून, यामध्ये डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, दृष्टी कमी होणे, सतत डोळ्यांतून पाणी येणे. तर गालांवर सूज येणे, काही खाताना दात दुखणे, ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
लक्षणं आढळल्यानंतर नेमके काय कराल?
म्युकरमायकोसिस या आजाराचे लक्षणे आढळल्यास त्वरित उपचारांची गरज असते. अन्यथा या आजाराची लागण झाल्यास पुढील एक ते दोन आठवड्यांत ही बुरशी डोळे किंवा मेंदूपर्यंत पोहोचू शकते. यात रुग्णाचे जबडा, डोळा हे शस्त्रक्रिया करून काढावा लागू शकतो; तर अशा प्रसंगी रुग्णांचा मृत्यूही ओढवतो. त्यामुळे कोव्हिड होऊन गेलेल्या रुग्णांनी त्यांचे तोंड व डोळे यांची तपासणी नियमित करावी. त्यातही ज्यांना मधुमेह असेल त्यांनी तातडीने तपासणी करावी.