राज्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन 15 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश आज राज्य सरकार कडून जारी करण्यात आला आहे.
या आदेशानुसार आज रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच काही नियम देखील कडक करण्यात आले आहे.
तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून हे निर्बंध 15 एप्रिलपर्यंत लागू करण्यात आले आहेत.
काय आहेत नव्या गाईडलाईन? :
▪️ आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास प्रत्येकी 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
▪️ आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद राहतील. मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.
▪️ आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद ठेवण्यात येणार आहेत.
▪️ होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या वेळेलाही या नियमांचे बंधन असणार आहे. मात्र, होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे.
▪️ या नियमांचे हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या मालकांनी उल्लंघन केल्यास ही सर्व स्थळे कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी फक्त 50 जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर, अंत्यविधीसाठी 20 जणांना परवानगी देण्यात आली आहे.