राज्यात आणखी कडक निर्बंध लादणार, पुढील दोन दिवसात निर्णय जाहीर करू; मुख्यमंत्री ठाकरे
राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रोज रुग्णवाढीचे धडकी भरवणारे आकडे समोर येत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्याबरोबर मर्यादित स्वरुपाचा लॉकडाउन देखील लागू करण्यात आला.
कोरोना असाच वाढत राहिला आणि लोकांनी काटेकोरपणे नियम पाळले नाहीत, तर राज्यात कडक निर्बंधांचा किंवा लॉकडाउनचा विचार करावा लागेल, असे संकेत राज्य सरकारने वारंवार दिले आहेत. राज्यातील एकूणच स्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधला.
[sc name=”adg”]
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे :
कोरोनाचा शिरकाव होऊन वर्ष पूर्ण झालं. मधल्या काळात या कोरोनाला रोखण्यास आपण यशस्वी झालो होतो. पण लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाल्याने कोरोना वाढला.
राज्यात रोज अडीच लाख चाचण्या करणार आहे. तर केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार चाचण्या होणार आहेत.
70 टक्के आर्टीपीसीआर चाचण्या करण्यात येणार आहेत. तर राज्यात लॉकडाउनची स्थिती अजूनही टळलेली नाही.
आज राज्यात 45 हजार कोरोना रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही. कडक निर्बंध लावावे लागतील, उद्या परवा जाहीर करु. गर्दी टाळावी लागेल, ऑफिसेसना नियमावली हवी.[sc name=”adg”]
तर बसना नियम, रेल्वे, बस तुडुंब आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली तर ब्राझीलसारखा शुकशुकाट दिसेल. रोजगारही गेला आणि जीवही गेला. तसं होऊ नये. दोन – तीन दिवसात मी पुन्हा बोलेन.
मी तज्ज्ञांशी बोलेन, मला पर्याय सांगा, लॉकडाऊन पर्याय नाही मान्य, मग करायचं काय जरुर सांगा.
[sc name=”adg”]