स्थिती गंभीर! मुख्यमंत्र्यांनी दिले लाॅकडाऊनची तयारी करण्याचे आदेश….
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. कोरोना रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची बैठक आज पार पडली.
या बैठकीत लॉकडाऊनच्या निर्णयाबाबतही चर्चा झाल्याचं कळतंय. रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्यामुळे रुग्णांसाठी बेड्स, अन्य आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं चित्र दिसून येत आहे
कोरोनाचे निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल, तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा, अशी या बैठकीत चर्चा झाली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच खासगी कार्यालये 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
[sc name=”adg”]
लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री म्हणाले?
एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील, याचा प्रयत्न करतोय. मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत.
खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये सुरक्षित अंतर, मास्कचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला प्राधान्य आहे.
त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे, अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल, असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.
बैठकीतील नेमका निर्णय काय? :
मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे, त्याची कार्यपद्धती मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्ध रीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल.
ऑक्सिजनची महत्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा. गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणकरण्यावर भर द्यावा.
मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील, त्यामुळे ई आयसीयू, व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे. प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी.
विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत. सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे.
[sc name=”adg”]
राज्यातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती
सध्या 3 लाख 57 हजार आयसोलेशन खाटापैकी 1 लाख 7 हजार खाटा भरल्या आहेत. उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. 60 हजार 349 ऑक्सिजन खाटापैकी 12 हजार 701 खाटा , 19 हजार 930 खाटापैकी 7 हजार 342 खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. 9 हजार 30 व्हेंटीलेटर्सपैकी 1 हजार 881च्या वर रुग्णांना ठेवण्यात आलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच होत नसून संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधाची क्षमता कमी पडत आहे.
[sc name=”adg”]
https://myletstalks.in/no-lockdown-but-statewide-curfew-from-today-no-entry-to-these-things-after-8pm-see-what-the-new-rules-are/