भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 2 एप्रिल हा दिवस खास आहे. आजच्या दिवशी 2011 साली भारताने दुसऱ्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. कपिल देवच्या टीमनं 1983 साली केलेल्या कामगिरीनंतर तब्बल 28 वर्षांनी भारतीय कॅप्टननं वर्ल्ड कप जिंकला.
[sc name=”adg”]
टीम इंडियाचा तेंव्हाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी याने सिक्स लगावत भारताच्या वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. धोनीचा तो अजरामर सिक्स, त्यानंतरच्या मिरवणुकीच्या दरम्यान सचिन तेंडुलकरचे अश्रू आणि संपूर्ण देशानं केलेला जल्लोष आज 10 वर्षांनी देखील सर्वांच्या लक्षात आहे.
नेमके काय घडले होते :
श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराने टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. माहेला जयवर्धनेने शतक झळकावत डावाला आकार दिला. तसेच कुमार संगकारानेही 48 डावांची खेळी केली. श्रीलंकेने विजयासाठी भारतासमोर 275 धावांचं लक्ष ठेवलं होतं.
[sc name=”adg”]
हे लक्ष गाठताना टीम इंडियाचे सेहवाग आणि सचिन लवकर बाद झाले. गौतम गंभीरने डाव सावरत 97 धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर आलेल्या धोनीने नाबाद 91 आणि युवराजने नाबाद 21 धावांची खेळी करत 49 व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केलं.
सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सचिनला खांद्यावर घेऊन मैदानात मारलेली ती रपेट आजही अनेकांच्या लक्षात आहे. सचिनसाठी आपण वर्ल्ड कप जिंकला अशी भावना युवराज सिंहने व्यक्त केली तर सचिनने गेली 21 वर्षे देशाची ओझं स्वत: च्या खांद्यावर पेललं, त्यामुळे आपण आता त्याचं ओझं पेलत आहोत अशी भावना विराट कोहलीने देखील व्यक्त केली होती.
[sc name=”adg”]