मोदी सरकारच्या ‘या’ योजने अंतर्गत मिळतात वर्षाला 42 हजार रुपये; कसा होईल तुम्हाला फायदा जाणून घ्या!
तुम्हीदेखील दर महिन्याला घरबसल्या तीन हजार रुपयांचा फायदा मिळवू इच्छित असाल तर, केंद्र सरकारची पीएम किसान योजना तुमच्यासाठी आहे.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी वार्षिक छत्तीस हजार रुपयांचा फायदा दिला जाणार आहे. तुम्ही त्यापैकी एक असाल तर, एकूण 42 हजार रुपयांपर्यंतचा लाभ तुम्ही मिळवु शकता. हे पैसे तुम्ही कसे मिळवाल ते जाणून घेऊयात:
पंतप्रधान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दर महिन्याला तीन हजार रुपये येतात, म्हणजे वार्षिक 36 हजार रुपये! पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 2 हजार रुपयांचे तीन हप्ते दरवर्षी मिळतात. म्हणजे दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात…
एखाद्या शेतकऱ्याला दोन्ही योजनांचा लाभ मिळत असेल तर, त्याला दरवर्षी 42 हजार रुपये सरकार देते. 18 ते 40 वर्षांपर्यंतच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो….
मात्र, यासाठी असणारी अट केवळ एकच शेतकऱ्याकडे किमान दोन हेक्टर शेतजमीन स्वतःच्या नावे असावी. याच बरोबर अठरा वर्षांच्या वयात तुम्ही या योजनेत जोडले गेल्यानंतर दर महिना 55 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत प्रीमियम तुम्हाला जमा करावा लागेल.
यामध्ये वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यासाठी वेगवेगळे प्रीमियम आहेत. मानधन योजना एक प्रकारची पेन्शन योजना आहे. यामध्ये छोट्या आणि भूमिहीन शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन ही दिली जाते. ही पेन्शन 60 वर्षे वयानंतर मिळते.