फळे, पालेभाज्या खाणे हे आरोग्यासाठी नेहमीच हितकारक असते हे आपण नक्कीच जाणतोच. फळांनी आणि पालेभाज्यांनी शरीराला आवश्यक असणारे घटक मिळतात. आज आपण अशी काही फळे व ताज्या भाज्या माहीत करून घेणार आहोत, जी आपली या कठीण काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात..
सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्या : सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीराला लोह, अँटी ऑक्सिडेंटस मोठ्या प्रमाणात मिळण्यास मदत होते. कच्च्या भाज्या या शिजवलेल्या भाज्यांहून अधिक प्रभावशाली असतात हे नक्कीच. त्यात पोषणतत्वे जशीच्या तशीच असल्याने शरीराला अधिक फायदा होतो आणि आजारपणात आपली ताकद तशीच राहते.
लिंबू : लिंबामध्ये व्हिटॅमिन सी प्रमाण जास्त प्रमाणात असते. यामुळे, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढीस लागते. लिंबाच्या सेवनामुळे रक्ताचे देखील शुद्धीकरण होते. शरीरात निर्माण होणाऱ्या विविध अनिष्ट घटकांपासून मुक्तता हि मिळू शकते.
आवळा : आवळा हा आपल्या आरोग्यास अतिशय हितकारक असतो. यात समाविष्ट असणारे व्हिटॅमिन बी5, बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे आपल्या शरीराला समृद्ध व निरोगी करतात आणि आवळा अँटी ऑक्सिडंट्स सुद्धा आपल्याला पुरवण्यास मदत करतात. याचे सेवन केल्यास नक्कीच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
संत्री : संत्री हे मानवी पेशी आणि पोटॅशियम ने समृद्ध असतात. संत्री मध्ये असणारे द्रव आपल्याला शरीरासाठी आवश्यक असणार संपूर्ण घटक पुरवतात. संत्रीमुळे पोटॅशियम आणि सोडियम क्रियांच्या सहाय्याने हृदयाचे ठोके व रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.
साध्यच्या काळात आपल्या दररोजच्या आहारात एक पालेभाज्या आणि एक तरी फळ असल्यास कोणताही संसर्गजन्य आजार आपणास झाला तरी त्यातून बरे होण्याची शक्ती देते किंवा त्या आजारबरोबर लढण्यास मदत करते. आज काल कोरोना महामारीचे थैमान सर्वत्र सुरू आहे, अशा काळात तर सर्वांनी आपल्या आहाराची काळजी घेणे सर्वात उत्तम उपाय आहे.