…फक्त याच मार्गाने तळपायाच्या भेगा होतील दूर!
पायांवर सतत पडणाऱ्या भेगा हे बऱ्याच जणांची तक्रार असते. परंतु थोडी अधिक काळजी घेतली तर पायावरील भेगा पासून आपल्याला सुटका मिळू शकते.
बाजारातील अनेक क्रीम्स, औषधे जे करू शकत नाहीत, त्या गोष्टी सहज उपाय करून साध्य होऊ शकतात. यासाठी तुम्हाला भेगांचा त्रास का होत आहे यामागील कारणे जाणून घेणे महत्वाचे आहे.
शरीरातील उष्णता हे एक मुख्य कारण असते पायांवरील भेगांचे. त्यामुळे जास्तीत जास्त थंड पदार्थ खाऊन शरीराची उष्णता कमी करू शकतो. तुमच्या आहाराचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो त्यामुळे त्याकडे लक्ष द्या.
आठवड्यातून 2-3 वेळा कोमट पाण्यात खडे मीठ टाकून 15 ते 20 मीनिटे पाय ठेवावे नंतर तेल किंवा क्रीम लावून मसाज करा आणि मोजे घालून ठेवा.
रात्री झोपताना असे केल्यास दिवसभर पडलेल्या ताणामुळे झालेला थकवा पण दूर होतो .
सोडा आणि दुधाने पायांवर मसाज केल्याने पायांवरील मेलेली त्वचा निघून जाते आणि भेगांची समस्या कमी होते.
गरम पाणी, मीठ आणि लिंबाच्या फोडीने जरी पाय धुतले तरी देखील बराच फरक जाणवतो.
याच बरोबर गुलाबजल आणि खडे मीठ यांचे मिश्रण सुद्धा तळपायाला स्वच्छ करून भेगा गायब करते.
या काही सोप्या पद्धतीने स्वतःच्या पायाची काळजी घेणे गरजेचे असते. परंतु, यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असते.