मागील काही दिवसांपासून तौत्के चक्रीवादळाच्या विध्वंसातून देश सावरलेला नसताना आता देशावर आणखी एक भयानक यास (Yaas) नामक चक्रीवादळ घोगावात आहे. सध्या त्याची वाटचाल सुरु झाली असून ते पश्चिम बंगालच्या दिशेने येणार आहे. हे यास चक्रीवादळ तौत्के आणि या आधीच्या अम्फान चक्रीवादळाइतकंच विध्वंसक आणि भयंकर असणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
यावेळी या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका पश्चिम बंगाल आणि ओडिशाला असणार आहे. हे चक्रीवादळ आज म्हणजे 24 मे पर्यंत तीव्र होणार असून, 26 मे रोजी किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता सरकारकडून त्यासंबंधित सर्व तयारी सुरू असून, वायुमार्गासह संरक्षण विमाने हे एक ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी मदत करण्यासाठी व बचाव पथकं आणि मदत करणारी मोठ्या प्रमाणतात टीम पाठवित आहेत. तसेच नौदल सर्व टीमला सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
दरम्यान, यासंबंधित पूर्व रेल्वेकडून 24 मे ते 29 मे या कालावधीत साधारण 25 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने हा निर्णयाला एक सविस्तर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केला आहे, तसेच या कालावधीत रद्द केलेल्या सर्व 25 गाड्यांची यादीही या प्रसिद्धी पत्रकात दाखवली आहे.
Eastern Railway suspends 25 trains between May 24 and 29 in view of cyclone Yaas
Read @ANI Story | https://t.co/7hvAzHjgHy pic.twitter.com/PuEALQhCtz
— ANI Digital (@ani_digital) May 24, 2021
तर या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर जास्त प्रमाणात परिणाम होणार नसल्याचे देखील हवामान खात्याने सांगतले आहे. तर या यास चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात वादळी वारे वाहणार असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, या यास चक्रीवादळामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या तयारीचा आढावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घेतला. तर यावेळी अतिजोखमीच्या भागांतील लोकांचे स्थलांतर सुरक्षितरित्या करावे व वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ आल्यास तो कालावधी कमी कमी ठेवावा, संपर्काचे सर्व जाळे कमी वेळेपुरते बंद ठेवावे आणि ते वेगाने पूर्ववत करावे, असे मोदी यांनी म्हटल्याचे पंतप्रधान कार्यालयाने निवेदनात म्हटले.