महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला असून ज्या ग्रामीण भागात कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात मान्यता देण्यात आली आहे.
या महत्वपूर्ण नियमावलीत राज्य सरकारने शाळा सुरु करण्यासाठी पालक आणि शाळांना काही प्रमुख निकष ठरून दिले आहे. ते पाहूया..
शाळा सुरू करण्याचे निकष
▪️ कोव्हिड-मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारित असणाऱ्या गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी पालकांशी चर्चा करुन ठराव करावा.
▪️ शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलवण्यात यावे. प्राधान्याचे विषय ठरवून वेळापत्रक तयार करण्यात यावे.
▪️ एका बेंचवर केवळ एकच विद्यार्थी बसू शकतो. तसंच एका वर्गात एकावेळी केवळ 15-20 विद्यार्थी बसू शकतील.
▪️ दोन बेंचमध्ये किमान सहा फूटाचे अंतर हवे.
▪️ प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक आहे.
▪️ शाळेतील शिक्षकांच्या राहण्याची सोय गावात करावी. किंवा शिक्षकांना सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करावा लागणार नाही याची खबरदारी घ्यावी.
▪️ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करावी.
पालकांनी कोणती काळजी घ्यावी?
▪️ राज्य सरकारने आपल्या शासन निर्णयामध्ये पालकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत काही सूचना केल्या आहेत.
▪️ आजारी असललेल्या आणि कोरोनाची लक्षणं असलेल्या विद्यार्थ्याला शाळेत पाठवू नये.
▪️ कुटुंबातील व्यक्तींनी नियमितपणे वाफ घ्यावी तसंच इतर दक्षता घ्यावी.
▪️ विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पालकांच्या संमतीवर अवलंबून असणार आहे.