सध्या अरबी समुद्रात तौत्के चक्रीवादाळाचं संकट घोंघावत आहे. हे चक्रीवादळ आता हळूहळू उग्र रुप धारण करत त्यानं आपली दिशा बदलली आहे. हवामान विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर, पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
आता हे वादळ मुंबईला भेदून गुजरातच्या दिशेनं आगेकूच करणार आहे. सध्या हे वादळ कोकण किनारपट्टीला धडकलं असून मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उर्वरित कोकणातील नागरिकांसाठी धोका वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर आज दुपारी मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
चक्रीवादळाचा सध्याचे लिव्ह लोकशन : https://www.windy.com/?16.194,76.816,5
मुसाकाझी येथील दोन कुटुंबातील लोकांचेही स्थलांतर केले आहे. तर आवळीचीवाडी येथील 7 कुटुंबातील 35 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राजापूर डोंगर मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली असून, झाड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, नाटे आणि परिसरात वेगाने वारे वाहायला सुरुवात झाली आहे आणि पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. जैतापुरात वाऱ्यामुळे घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. वादळाचे वारे हळूहळू रत्नागिरीकडे सरकत आहे. या वादळचा पुढे सारकण्याचा वेग 7 किलोमीटर प्रति तास एवढा आहे.