माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीत खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
गांधी यांनी 3 वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते.
काल त्याचं कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांना काल त्रास होते असल्याने दिल्लीतील एका रुग्णालयात निधन झाले.
दिलीप गांधी यांची राजकीय कारकीर्द
सुरुवातीला नगरसेवक म्हणून अहमदनगर महानगरपालिकेत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नंतर ते नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचे नेते झाले.
1985 मध्ये ते अहमदनगर महानगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले. भाजपच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
दिलीप गांधींचे तिकीट कापून सुजय विखेंना उमेदवारी
2019 मध्ये दिलीप गांधी यांचे तिकीट कापून भाजपने राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली. यावेळी दिलीप गांधी नाराज असल्याच्या चर्चा होत्या.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांधींची भेट घेऊन मनोमीलन केल्याचंही बोललं जात असे. अखेर, सुजय विखेंनी भाजपची जागा राखली.
दरम्यान केंद्रीय आराेग्य मंत्री हर्षवर्धन गाेयल यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून तसेच हाॅस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्याही सूचनाही केल्या होत्या.