कोरोना(corona) महामारीचे महाराष्ट्र(maharashtra) राज्यावरील संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसल्याने आज ठाकरे सरकारने लॉकडाउन(lockdown) वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी मुख्यमंत्री निर्णय घेत अंतिम निर्णय जाहीर करतील अशी माहिती दिली होती.
त्याप्रमाणे आता 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा मुख्यमंत्रीनी याविषयी अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. यंदा ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक अधिक असल्यानेच सध्या लागू असलेले कठोर निर्बंध 31 मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेच सांगितले आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्यात 14 एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते, आधी हे निर्बंध 1 मेपर्यंत होते तर नंतर यामधी वाढ करून ते 15 मे पर्यंत वाढवण्यात आले होते. परंतु आता ही मुदत शनिवारी संपत असल्याने काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर मोठी चर्चा करण्यात आली त्यानतंर हा निर्णय घेतल्याचे सांगतले जाते.
या परिपत्रकानुसार ‘ब्रेक द चैन’ अंतर्गत नवी नियमावली
1) परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना 48 तास आधीचा RTPCR रिपोर्ट बंधनकारक
2) महाराष्ट्रातून घोषित केलेल्या संवेदनशील राज्यातून येणाऱ्या RTPCR रिपोर्ट बंधनकारक असणार
3) परराज्यातून मालवाहूतक करणा-यांना RTPCR रिपोर्ट निगेटीव्ह असावा तो 7 दिवस ग्राह्य धरणार
4) मालवाहतूक ट्रकमध्ये केवळ एक ड्रायव्हर आणि एका क्लिनरलाचं प्रवेश
5) बाजारपेठामध्ये गर्दी वाढल्यास स्थनानिक आपत्ती व्यवस्थापनाने तो बंद करण्याचा निर्णय घ्यावा
6) दूधाचे कलेक्शन, वाहतूक आणि प्रकिया यांना परवानगी असणार
7) एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल मेट्रो आणि मेट्रो मध्ये प्रवाशांची परवानगी
किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला विक्री, फळे विक्री, अंडी,मटण, चिकन,मासे विक्री, कृषी संबंधित सर्व सेवा, दुकाने, पशूखाद्य विक्री, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने – सकाळी 7 ते 11 या कालावधीत चालू ठेवण्याची मुभा आहे