अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. यंदा मुंबईतल्या नामाकिंत कॉलेजचा कट-ऑफ 90 टक्क्यांवर लागला आहे. मुंबई विभागात 1 लाख 17 हजार 883 विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत कॉलेज प्राप्त झालं आहे. तर 48 हजार 788 विद्यार्थ्यांना आपल्या पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालेलं आहे. जेवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी 61 टक्के विद्यार्थ्यांना आता कॉलेजेस प्राप्त झाली आहेत.
तर शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे घेण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची आकडेवारी जाहीर केली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतील मुंबई, अमरावती, नागपूर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांमधील पात्र विद्यार्थी आणि महाविद्यालय अलॉट करण्यात आलेली संख्या शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
महाविद्यालय अलॉट झालं का कसं तपासायचं?
▪️ सर्वप्रथम अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम https://11thadmission.org.in या वेबसाईटला भेट द्यावी.
▪️ यानंतर नोंदणीवेळी मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड नोंदवून लॉगीन करा
▪️ लॉगीन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवेशाचा तपशील पाहायला मिळेल
▪️ वेबसाईटवरील चेक अलॉटमेंट स्टेटस वर क्लिक करा
▪️ तुम्हाला महाविद्यालय अलॉट झालं असेल तर त्याचं ना तुम्हाला स्क्रिनवर पाहायला मिळेल
Those allotted colleges can confirm their admissions before 6 pm, Aug 30. Those not allotted colleges yet, do not worry, there are three more rounds. No student will remain without a college. There are sufficient seats. #FYJC #admissions @msbshse @scertmaha
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) August 27, 2021
आता अॅपच्या माध्यमातून घरबसल्या प्रक्रिया करा
दरम्यान, अकरावीला प्रवेशासाठी होणारा गोंधळ आणि किचकट प्रक्रिया सोडवण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून एका मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात असून विद्यार्थी आता POEAM अॅपच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाची धोका आणि महाविद्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी या अॅपचा उपयोग होणार आहे. विद्यार्थ्यांना गुगल प्ले स्टोअर आणि आयओएसवर ही अॅप उपलब्ध होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
Students can now complete their Centralised Admission Process to #FYJC 2021-22 using our android mobile app, POEAM. Click here to download https://t.co/9PAoXWJsXb
We are working on an app for iOS users also. #FYJC #admissions @CMOMaharashtra @scertmaha @msbshse @INCMumbai pic.twitter.com/Rz0KFvAbAI— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) August 27, 2021
30 ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा
शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशा विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अभिनंदन केलं आहे. पहिल्या गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांनी 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं केली जाते.