मागील काही दिवसांपूर्वीच देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या दिवशी देशाचे पंतप्रधान मोदींजीनी तिरंगा फडकवून राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी 100 व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत भारताला स्वावलंबी बनवण्याचे ध्येय जाहीर केले.
दरम्यान, आम्ही देखील तुमच्यासाठी काही अनोखी माहिती घेऊन आलो आहोत. खरं तर आम्ही तुम्हाला दूध आणि साखरेसह 8 आवश्यक गोष्टींचे आजचे दर आणि 1947 साली असणारे दर येथे दिले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर गेल्या 74 वर्षांत या गोष्टींच्या किंमती किती वाढल्या आहेत याची कल्पना तुम्हाला यावरून मिळू शकते.
तांदूळ दर : 1947 मध्ये एक किलो तांदळाची किंमत फक्त 12 पैसे होती. होय, फक्त 12 पैसे. तर आज तांदळाचा दर 70 रुपये प्रति किलो आहे. स्वातंत्र्यापूर्वी 8 किलो तांदूळ फक्त एका रुपयाला विकत घेता येत असे.
बटाटा किंमत : भारतात बटाट्याचा वापर खूप जास्त आहे. हे देशाच्या प्रत्येक भागात खाल्ले जाते. 1947 मध्ये एक किलो बटाट्याची किंमत फक्त 25 पैसे होती. म्हणजेच, तुम्ही 1 रुपयात 4 किलो बटाटे खरेदी करू शकता. तर आज बटाट्याचा दर 25 रुपये किलो आहे.
दुधाची किंमत : स्वातंत्र्याच्या वेळी फुल क्रीम दुधाचा दर फक्त 12 पैसे प्रति किलो होता. आज दुधाचा दर 58 रुपये प्रति किलो आहे. अलीकडे अमूल आणि मदर डेअरीने दूध महाग केले आहे.
दुचाकीची किंमत : जे सायकल तुम्ही आज 4500-5000 रुपयांना विकत घेता ते 74 वर्षांपूर्वी फक्त 20 रुपयांमध्ये उपलब्ध होते. आज तुम्हाला 5000 रुपयांमध्ये चांगली सायकल मिळेल.
सोन्याची किंमत : सोन्याला नेहमीच मागणी राहिली आहे. 1947 मध्ये, ही मौल्यवान धातू फक्त 88.62 प्रति 10 ग्रॅम होती. जर तुम्ही आज पाहिले तर हा दर सुमारे 46700 रुपये आहे. सोन्याचे दर किती पटीने वाढले याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
पेट्रोल दर : सध्या भारतात पेट्रोलची किंमत इतिहासातील सर्वोच्च विक्रमावर आहे. म्हणूनच तुम्हाला 1947 च्या पेट्रोलचे दर जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. 1947 मध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत फक्त 27 पैसे होती. तर त्याचा पेट्रोल आज शंभरी पार आहे.
ट्रेनचे भाडे : दिल्ली ते मुंबई फर्स्ट क्लास चे भाडे 74 वर्षांपूर्वी फक्त 123 रुपये होते. तर आज हे भाडे 5025 रुपये आहे.
विमान तिकीट : आज दिल्ली ते मुंबई विमानाचे तिकीट 5000 रुपयांपेक्षा जास्त आहे. तर 1947 मध्ये ते फक्त 140 रुपये होते. सरकारने देशांतर्गत उड्डाणांमध्ये किमान आणि कमाल देशांतर्गत विमान भाड्यात किमान 12.5 टक्के दरवाढ जाहीर केली आहे. सरकारने 1 जून 2021 रोजी देशांतर्गत विमानभाड्यांमध्ये 15 टक्क्यांनी वाढ केली होती आणि त्याआधी किंमतींमध्ये किमान दोन वेळा वाढ केली होती.