जेवतांना किती पाणी पिणे योग्य आहे? जाणून घ्या पाणी पिण्याच्या योग्य सवयी आणि पद्धती
उत्तम आरोग्यासाठी वेळोवेळी पाणी पिणे खूप फायदेशीर असते. सर्वांनाच दिवसभरात कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतू जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. संशोधकांच्या मते जेवणानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यास अपायकारक होवू शकते. तज्ञांच्या मते जेवतांना मधे मधे पाणी पिणे सुरक्षित आहे. परंतू जेवणा नंतर किंवा जेवणापूर्वी पाणी पिण्याने पचनक्रिया बिघडू शकते.
जेवणानंतर लगेचच पिणी पिण्याने पचनसंस्थेकडून गैस्टिक रस निर्माण होऊन तो पाचन क्रियेत मिसळला जातो. परिणामी अन्नातील पोषक तत्व शरीरास प्राप्त होते नाहीत. तसेच जेवणा नंतर लगेच पाणी पिण्याने गॅस, अपचन व ऍसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात.
पाणी नेहमी जेवणाच्या आधी अर्धा तास तसेच जेवणा नंतर अर्धा तासाने प्यावे. कारण जेवणानंतर साधारण अर्ध्या तासात पोटात पचनासंबधीत प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर पानी पिण्याने पचनासंबंधी काही समस्या निर्माण होणार नाहीत, तर अन्न पचनात याची मदतच होईल .जर जेवताना मधे मधे थोडं घोट घोट पाणी पिलं तर ते अपायकारक होणार नाही. पण जेवताना जास्त पाणी पिण्याने पोट लवकर भरेल आणि ते पोटाच्या समस्येचे कारण बनू शकते. जेवणानंतर पाणी पिण्यामुळे वजन वाढते, कफाचे विकार होतात.
रोज सकाळी अनोशापोटी गरम पाणी पिण्याने पचनक्रिया सुधारेल. वजन कमी होईल तसेच त्वचेसंबंधीत समस्याही कमी होतील. स्नान केल्यानंतर एक पेला पाणी पिण्याने शरीरातील रक्तसंचार योग्य राहील तसेच ब्लड प्रेशरच्या समस्येपासून बचाव होवू शकतो आणि शरीरात उर्जाही योग्य राहील.
उत्तम आरोग्यासाठी थंड पाणी पिणे टाळावे. तसेच, पाणी नेहमी खाली बसून प्यावे. उभे राहून पाणी पिल्याने ही पाण्याची धार आपल्या पोटाच्या आतल्या भिंतीवर आदळते व सांधेदुखी आणि पचनाचे विकार उद्भवतात. उभ्याने पाणी प्यायलेले ते अन्ननलिकेच्या खालील भागावर जोरदार आघात करते. त्यामुळे पोट आणि अन्ननलिकेला जोडणाऱ्या स्थायूंवर दाब पडतो आणि त्याला इजा पोहचण्याचा धोका असतो. त्यामुळे पोटात जळजळ होण्याचा त्रास होतो. तसेच पाणी पोटात वेगाने येत असल्याने आम्लाची हलचाल वेगावल्याने ऍसिडिटीचा त्रास होतो.
उभं राहून पाणी पिताना शरीरातील अनेक स्थायूंवर एकाच वेळी ताण येत असतो. पण तुम्ही बसून पाणी प्यायल्यास पॅरासिम्पॅटेपेटिक (स्नायू आणि मज्जातंतूच्या एकत्रित सहभागाने होणारे काम) प्रक्रिया आराम आणि पचन मोडवर असते. त्यामुळे अन्नपचन आणि शारीरिक प्रक्रियांसाठी पाण्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होतो.
एकाच वेळी घटाघटा भरपूर पाणी पिऊ नये, घोट घोट प्यावे. उन्हातून आल्याआल्या पाणी मुळीच पिऊ नये. “कंदिलाच्या तापलेल्या काचेवर पाण्याचा थेंब पडल्यास काच तडकते” हे लहानपणी शिकलेले तत्व आपल्या स्वास्थ्याच्या बाबतीतही लक्षात ठेवावे. तहान असेल तेवढेच पाणी प्यावे, कोणी सांगितले म्हणून किंवा वाचून, ऐकून जास्त पाणी मुळीच पिऊ नये.