इयत्ता 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी काल बालभारतीने प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र यामध्ये काहीकाही प्रश्न एकापेक्षा जास्त वेळा प्रसिद्ध करण्यात आलेत, तर वगळलेल्या अभ्यासक्रमाबाबतही देखील प्रश्न देण्यात आले आहेत असे सांगतिले जाते.
नेमके प्रकरण काय ?
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या सरावासाठी ऑनलाइन प्रश्नसंच उपलब्ध केले आहेत. पहिल्या टप्प्यात बारावीच्या सात आणि दहावीच्या सहा विषयांचे प्रश्नसंच उपलब्ध केले आहेत.
येत्या काही दिवसांत सर्व विषयांचे प्रश्नसंच मिळणार आहेत. लॉकडाउनमुळे शाळा अजूनही बंद असल्याने विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव पुरेसा झालेला नाही. यातच दहावी आणि बारावीच्या परीक्ष देखील ऑनलाइन घ्याव्या की ऑफलाइन घ्याव्यात, याबाबत चर्चा सुरू आहेत.
यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर पालक, शिक्षक यांच्या मागणीनुसार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रश्नसंच उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले होते. यानुसार हे संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना प्रश्नपेढ्या ऑनलाईन डाऊनलोड करून परीक्षेचा सराव करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे लागेल 👉 https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi
मात्र, आता सध्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रश्नसंचांमध्ये काही चुका असल्याचे पालक आणि विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे पुढे येणारे प्रश्नसंच योग्य पद्धतीने तपासून अपलोड करावेत, अशी मागणी विद्यार्थी व पालक करत आहेत.
दरम्यान, मात्र, सध्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या संचांमध्ये काही चुका असल्याचे पालक आणि विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे हे प्रश्नसंच अभ्यासपूर्णरित्या तयार झाले नाहीत, अशी टीका आता होत आहे.