केंद्र सरकारच्या ‘या’ योजने अंतर्गत दरवर्षी मिळतील 36000 रुपये; जाणून घ्या काय आहे योजना
केंद्र सरकार हे नेहेमीच सर्वसामान्यांसाठी काहींना काही नवनवीन सरकारी योजना राबवत असतात. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या अशाच एका महत्तवपूर्ण योजने बद्दल सांगणार आहे. नेमके हि योजना काय, त्याचे फायदे, त्याचे करणे आज आम्ही तुम्हला खालील लेखात सांगणार आहोत, पाहूया…
या आधी ऐकले असेल, प्रधानमंत्री किसान कल्याण योजनेतील – किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपये दिले जातात. परंतु, केंद्र सरकारची आणखी एक मोठी योजना आली आहे. ज्याअंतर्गत सर्वसामान्य शेतकरी वर्षाकाठी 36000 हजार रुपये पर्यंत मिळवू शकतात. या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजना असे आहे.
जाणून घेऊया ‘या’ योजने विषयी थोडक्यात :
पंतप्रधान किसान मानधन योजना हि एक पेन्शन योजना म्हणूनही अवगत आहे. केंद्र सरकारने मागील दोन वर्षां पूर्वी म्हणजेच 31 मे 2019 रोजी ही योजना सुरू केली. केंद्रातील मोदी सरकारने देशातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकर्यांच्या मदतीसाठी ही खास योजना सुरू केली आहे. ही एक निवृत्तीवेतन योजना असून, याअंतर्गत शेतकऱ्याला वयाच्या 60 व्या वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 3000 रुपये म्हणजेच वार्षिक 36000 रुपये एवढी पेन्शन म्हणून दिले जातील.
हि योजना म्हणजे नेमके काय :
या योजनेतील नियमांनुसार, जर एखादी शेतकरी व्यक्ती (ज्याची 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन शेती आहे असे) 18 वर्षे वयाचा असेल तर, त्याला दरमहा 55 म्हणजे अर्थातच वर्षाकाठी 660 रुपये जमा करावे लागतील. यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावर त्याला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळेल. 3000 दरमहा म्हणजे अर्थातच 36000 वर्षाकाठी होय. कोण कोणाला मिळेल लाभ, घ्या जाणून..
या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
1.18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2. यासाठी लागवडीयोग्य जमीन जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत असावी.
3. किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे शेतकऱ्याच्या वयानुसार 55 ते 200 रुपयांपर्यंत मासिक योगदान द्यावे लागेल.
4. वयाच्या 18 व्या वर्षी सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना 55 रुपयांचे मासिक योगदान देय असेल.
5. तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी या योजनेत सहभागी झाल्यास तुम्हाला 110 रुपये जमा करावे लागतील.
6. जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी सहभागी असाल तर तुम्हाला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील.
या योजना घेण्यासाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र :
– आधार कार्ड
– ओळखपत्र
– वयाचे प्रमाणपत्र
– उत्पन्नाचा दाखला
– शेताचा सातबाराचा उतारा
– बँक खाते पासबुक
– मोबाइल नंबर
– पासपोर्ट आकाराचा फोटो
कसे करणार ‘या’ योजनेची नोंदणी :
सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची अधिकृत वेबसाइट maandhan.in वर जावे लागेल.
वेबसाइटवर जाऊन लॉग इन करण्यासाठी maandhan.in/auth/login, पेजवर दिसणाऱ्या क्लिक हिअर टू अप्लाय या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
लॉगिन दरम्यान, अर्जदारास त्याचा फोन नंबर टाकावा लागेल. याशिवाय त्यावर तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, कॅप्चा कोड इत्यादी मागितली जाणारी इतर माहिती टाकावी लागले.
यानंतर जनरेट ओटीपीवर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी(OTP) येईल. तो भरल्यानंतर, एक अर्ज आपल्यासमोर येईल.
या अर्जामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती भरून सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंटआउट काढता येईल. जेणेकरून येणाऱ्या काळात केव्हाही सहज वापर करता येईल.