मुलींच्या लग्नासाठी सरकार देणार 51 हजार; काय आहे योजना आणि कसा मिळेल लाभ जाणून घ्या!
आपल्या देशामध्ये रूढी परंपरा नुसार मुलींना समाजात पाहिजे तसे स्थान दिले जात नाही. मुलगा-मुलगी समान आहे असे म्हणताना देखील, मुलींनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत यावर अनेक बंधने घातली जातात.
अनेक समाजामध्ये मुलीला जास्त शिकवले तर, तिचे लग्न करताना तिच्या एवढा शिकलेला मुलगा मिळणार नाही म्हणून आई-वडील मुलींना कमी शिकवणे पसंत करतात.
अल्पसंख्यांक समाजामध्ये तर परिस्थिती अजूनच बिकट आहे. या समाजातील मुलींना शिक्षण व्यवस्थित मिळावे आणि लग्नाच्या आधी निदान पदवीपर्यंत शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना आणली आहे.
मुस्लिम समाजातील लग्नापूर्वी पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींना लग्नासाठी 51 हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचे नाव शादी शगुन असे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशाच मुली पात्र असणार आहेत ज्यांनी, शालेय शिक्षण घेताना बेगम हजरत महल ही शिष्यवृत्ती मिळवली आहे.
शादी शगुन योजनेबाबत सविस्तर माहिती तुम्ही केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक कल्याण मंत्रालयाकडून प्राप्त करू शकता.
जर तुम्हाला एसएसवाय योजनेबाबत जास्त माहिती घ्यायची असेल.
तर त्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करा : https://www.india.gov.in/schemes-maulana-azad-education-foundation